एवढं लक्षात ठेवा…असे म्हणत अजित दादांचे तडाखेबाज प्रत्युत्तर
मुंबई (Ajit Pawar) : अर्थसंकल्पावरील (Maharashtra budget) चर्चेला उत्तर देताना आज अजित दादा पवार (ajit pawar) खूपच फार्मात आले होते. त्यांनी विंदा करंदीकर यांच्या ‘एवढं लक्षात ठेवा’ या कवितेचा उल्लेख करून विरोधकांवर तुफान हल्ला चढवला. तब्बल पावणे दोन तासाच्या वर केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेसच्या काळातील दाखले देऊन विरोधकांनी केलेले वार परतवले. विरोधक खोटे बोलतो आणि ते आश्वासन पाळत नाहीत असे इतिहासातील दाखले देत तुफान टोलेबाजी केली. त्यांच्या रडारवर जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) व भास्कर जाधव हे सदस्य प्रामुख्याने होते.
अर्थसंकल्पावरील (Maharashtra budget) चर्चा तीन दिवस चालली. त्यामध्ये 70 सदस्यांनी सहभाग घेतला. संकल्प फुटल्याचा वृत्ताचा अजित दादा (ajit pawar) यांनी खंडन केलं. अर्थसंकल्प बाबत पूर्णपणे गोपनीयता राखल्या गेली आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अर्थसंकल्पात प्रयत्न केला गेला आहे. लोक कल्याणाच्या बरोबर राज्याची आर्थिक स्थिती उत्तम राहील अशी व्यवस्था अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महिलांना सशक्त करण्याचा यात प्रयत्न केला गेला आहे. महसुली जमा यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा अकरा टक्क्याने वाढ झाली. केंद्राच्या कर हिश्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशला ज्या पद्धतीने केंद्राकडून विशेष मदत मिळाली त्याच पद्धतीचे मदत राज्यालाही मिळण्याचे काम सरकार करणार आहे.
ऑगस्टपर्यंत जवळपास एक लाख 9 हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. राज्याच्या इतिहास एवढी मोठी भरती आज पर्यंत कधीही झाली नाही. महसुलाचा विनियोग या मुद्द्यावर बोलताना त्यांनी, महसुलाचा जवळपास 58% खर्च पगारावर होतो. लोककल्याणकारी योजनांवर खर्च करणे आवश्यक असते आणि तो केला जातो. महसुली तूट 20 हजार कोटीची जरी दिसत असली तरी वर्षाच्या शेवटी खर्चावर नियंत्रण आणून ती कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पवार (ajit pawar) म्हणाले.
शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार
राजकोषीय तूट दिसत असली तरी राज्याचे आर्थिक स्थिती उत्तम आहे राज्य आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. जेव्हा देशाची पाच ट्रिलियन डॉलरची (Maharashtra budget) अर्थव्यवस्था होईल. तेव्हा राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची असेल. देशाच्या सकल उत्पन्नात राज्याचा वाटा जवळपास 14 टक्के आहे. खराब झालेल्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात (Green hydrogen) राज्याने मोठी गुंतवणूक केली आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील काही वर्षात मोफत वीज मिळणे शक्य होईल.
जीएसटी मुळे महसुलात वाढ
जीएसटी आल्यानंतर करदाते वाढले व करातून मिळणारे उत्पन्न वाढले आहे. राज्याच्या कर स्त्रोतात दोन ते पाच टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. पायाभूत विकास कामात राज्य उत्तम कामगिरी करीत आहे. राज्यातील उद्योग इतर राज्यात निघून गेले याचा अजित दादांनी खंडन केले. ही वस्तुस्थिती नाही राज्यामध्ये उत्तम गुंतवणूक येत आहे. यावर उद्योग मंत्री श्वेतपत्रिका प्रकाशित करणार आहेत.
राज्यावरील कर्जाची वस्तुस्थिती
कर्ज सात लाख 52 हजार कोटी रुपये झालं आहे, हे खरं आहे. राज्याचे कर्ज जरी वाढत असलेलं दिसत असलं, तरी राज्याचा अर्थव्यवस्थेचा आकारमान वाढत असल्यामुळे ते कर्ज वाढलेले दिसते. परंतु टक्क्याच्या दृष्टीने आणि आरबीआय नियमांचा विचार करता ते तीन टक्क्याच्या आतच आहे. कर्जावरील व्याजाची टक्केवारी वाढली नाही.
मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक
वारीमध्ये राज्यातील एवढा जनसमुदाय जात असताना त्यांच्याप्रती आतापर्यंत केवळ एकनाथ शिंदेंनीच एवढी आपुलकी दाखवली. यापूर्वीच्या कुठल्या सरकारने अशा पद्धतीचे आपुलकी दाखवली नव्हती असे अजित दादा म्हणाले. लेक लाडकी योजनेत महिलांना आवाहन आहे की, या योजनेमध्ये सहभागी घेण्यासाठी कोणालाही एक दमडीही देऊ नका आणि जो असा कोणी पैसा मागत असेल त्याची तक्रार करा. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे अजित दादा (ajit pawar) म्हणाले. अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिलेली आहे. अर्ज ऑगस्टमध्ये जरी भरला तरी जुलै महिन्यापासून महिलांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये आणखी काही दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्त केल्या जाईल असे आश्वासन अजित दादांनी सभागृहाला दिले. पिंक ही रिक्षा ची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे, आता प्रत्येक जिल्ह्याला आवश्यकतेनुसार हा निधी देण्यात येईल.
खोटारडा विरोधक
विरोधी पक्ष हे खोटारडे आश्वासन देतो. पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख करून अजित दादांनी त्यांचे बोल त्यांच्या घशात उतरवले. आम्ही सरकारमध्ये आलो तर महिलांना वर्षाला एक लाख रुपये देऊ असे आश्वासन पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात केले होते. त्याचा समाचार घेताना अजित दादांनी ते कसं पूर्ण होईल असा सवाल विचारला. त्यासाठी राज्याला जवळपास अडीच लाख कोटी खर्च करावे लागतील. हे सहन करण्याची राज्याची आर्थिक परिस्थिती आहे काय? असावा सवाल अजित दादांनी (ajit pawar) केला. २००३-०४ साली शेतकऱ्यांचे वीज बिल माफ अरू अशी घोषणा करून काँग्रेसने निवडणुका जिंकल्या होत्या. निवडून आल्यानंतर मात्र काँग्रेस सरकारने हे आश्वासन पाळू शकत नाही असे म्हणून दिलेले आश्वासन फिरवले होते. फाटका खिसा घेऊन विरोधक न पूर्ण होणारे आश्वासन देतात. अशा शब्दात अजितदादांनी विरोधकांच्या आश्वासनांचा समाचार घेतला.




