शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक
मुंबई (Maharashtra Council 2024) : पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon session) पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकरी प्रश्नावर विरोधीपक्षातील आमदारआक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘ शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या धिक्कार असो’ म्हणत (Anti-farmer government) सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी
मुंबई येथे गुरुवार पासून (Maharashtra Council) पावसाळी अधिवेशनाची सुरवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी आक्रमक झाली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कमिशनखोर आणि टक्केवारी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची निदर्शने
शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी, कोरडा डोळा कोरडी विहीर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोण देणार धीर, शेतकरी विरोधी (Mahayuti Govt) महायुती सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, (Anti-farmer government) शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे,अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.