जाणून घ्या…महाराष्ट्रात राहणारे 5,000 पाकिस्तानी नागरिक कोण?
मुंबई (Maharashtra Pakistani citizen) : 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या (Pahalgam Terrorist Attack) दहशतवादी घटनेनंतर, भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना पूर्वी दिलेले व्हिसा रद्द करणे समाविष्ट आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना 29 एप्रिलपर्यंत अल्पकालीन व्हिसावर भारतात राहणाऱ्या (Pakistani citizen) पाकिस्तानी नागरिकांना ओळखून ते देशाबाहेर काढण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने विविध व्हिसा श्रेणींमध्ये राज्यात राहणाऱ्या (Pakistani citizen) पाकिस्तानी नागरिकांची अधिकृत संख्या जाहीर केली आहे. ज्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सुरुवातीच्या अहवालांनुसार, सुमारे 250 पाकिस्तानी नागरिक (Pakistani citizen) अल्पकालीन व्हिसावर महाराष्ट्रात आले होते. त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की, त्यापैकी बहुतेकांनी दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज सादर केले होते. त्यापैकी काही जण दुसऱ्या राज्यातून आले होते, पण काही जण मुंबईहून पाकिस्तानला विमानाने जात होते.
महाराष्ट्रातून किती पाकिस्तानी नागरिक हद्दपार?
महाराष्ट्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दीर्घकालीन व्हिसा (long Term Visa) शोधणाऱ्यांना परत पाठवण्याबाबत केंद्र सरकारने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. यामुळे, महाराष्ट्रात अल्पकालीन व्हिसा धारकांची संख्या 18 वर आली. ज्यामध्ये दोन मुस्लिम आणि 16 हिंदूंचा समावेश आहे. यापैकी चार जण आधीच पाकिस्तानात परतले आहेत. ज्यात दोन मुस्लिम आणि दोन हिंदूंचा समावेश आहे. पुढील काही दिवसांत (Pakistani citizen) पाकिस्तानला जाणारे उर्वरित 14 जण निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महाराष्ट्रात राहणारे 5,000 पाकिस्तानी नागरिक कोण?
त्याचवेळी, आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे की, महाराष्ट्रात 5,000 हून अधिक (Pakistani citizen) पाकिस्तानी नागरिक दीर्घकालीन व्हिसावर (long Term Visa) राहत आहेत. यापैकी बहुतेक सिंधी हिंदू आहेत आणि 300 मुस्लिम आहेत. दीर्घकालीन व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचे केंद्र सरकारकडून कोणतेही निर्देश नाहीत.
दीर्घकालीन व्हिसा म्हणजे काय?
पाकिस्तानी नागरिकांना (Pakistani citizen) हद्दपार करण्याचे भारत सरकारचे निर्देश विशेषतः अल्पकालीन व्हिसावर राहणाऱ्या (Pakistani citizen) पाकिस्तानी नागरिकांसाठी आहेत. पाकिस्तानातून येणाऱ्या हिंदू ज्यांच्याकडे दीर्घकालीन व्हिसा (long Term Visa) आहे, त्यांना या निर्वासन नियमातून सूट देण्यात आली आहे. हा सरकारी आदेश दीर्घकालीन व्हिसा धारण करणाऱ्या व्यक्तींना लागू होत नाही, जसे की भारतीय नागरिकांशी विवाह केलेल्या व्यक्तींना.
महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता
विशेष म्हणजे, अहवालात महाराष्ट्रातील 107 पाकिस्तानी नागरिकांच्या (Pakistani citizen) गूढपणे बेपत्ता होण्याचा उल्लेख होता. (Maharashtra Police) महाराष्ट्र पोलिसांनी स्पष्ट केले की, हे लोक 1950 आणि 1960 च्या दशकात राज्यात स्थलांतरित झाले होते, ज्या काळात रेकॉर्ड ठेवणे इतके कठोर नव्हते. अलिकडेच त्यांना बेपत्ता म्हणून सूचीबद्ध केले जात होते. परंतु आता असे समजते की, त्यापैकी बरेच जण एकतर मरण पावले आहेत किंवा त्यांची नावे नंतर अधिकृत नोंदींमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.