परभणी/पूर्णा (mango tree) : आजी आजोबांनी लागवड केलेल्या तर कोठे नैसर्गिक उगवण झालेल्या शेतातील गावरान आमवृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्याने गावरान (mango tree) आंब्याच्या आमरसाची चव दुर्मिळ झाली आहे.
पूर्णेच्या बाजारात कलमी आंब्याची चलती, “शेंद्रया-शेप्या”
पूर्णा तालुक्यासह परिसरात पूर्वी प्रत्येक गावागावांत नामांकित गावरान आमराया अस्तित्वात होत्या. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर लागवड केलेली तर काही नैसर्गिक उगवण झालेली गावरान आंब्याची शंभर-पन्नास झाडे उभे होते. मात्र, अलीकडील काळात शेतकऱ्यांनी झाडाखाली पिके वाढत नसल्याने गावरान आंब्याची विस्तीर्ण झाडे तोडून नवीन संकरित, कलमी करण केलेली विविध जातीच्या (mango tree) आंब्याच्या झाडांची लागवड केली. त्यामुळे ग्रामीण भागात आता गावरान आंबे दुर्मीळ झाले. क्वचितच एखाद्या ठिकाणी गावरान आंब्याचे झाड दृष्टीस पडते. परिणामी शेंर्धा, शेप्या, कबड्या. चांदण्या आदी मौल्यवान गावरान (mango tree) आंब्याची सर्रासपणे सुरू झालेली वृक्षतोड आमराया दुर्मिळ होण्यास कारणीभूत ठरली.
कुबड्या’ आदी जाती नामशेष
फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावरान (mango tree) आंब्याला आता उतरती कळा लागली. पूर्वी घराघरांमध्ये गावरान आंबे पिकविण्यासाठी लगबग असायची. घरात प्रवेश करण्यापूर्वीच पिकविण्यासाठी टाकलेल्या गावरान आंब्याच्या आढयांचा सुगंध जिभेस पाणी आणे. पाहुणे आल्यावर त्यांच्यासमोर बादलीभर पाणी व टोपलेभर आंबे ठेवले जात. आमरस अन् पोळी हा विशेष पाहुण्यांचा पाहुणचाराचा खास मेणू असायचा. मात्र, हे सर्व कालबाह्य झाले. शंभर-दीडशे रुपये किलोप्रमाणे आता बाजारातून (mango tree) आंबे खरेदी करून पाहण्याची हौस भागवावी लागते आहे. बाजुच्या हिंगोली, बिड ,लातुर जिल्ह्यातून गावरान आंबा पूर्णेत विक्रीसाठी येत असे. परंतु तो ही आता बाजारात येणे पुर्णपणे बंद झाले आहे.
कलमी आंब्यांना अधिक पसंती
कलमीकरण व उत्पन्नाच्या लालसेपायी गरिबांच्या खिशाला भुर्दंड सोसावा लागत आहे. पूर्वी आंबा थोडा जरी आंबट लागला की फेकून दिले जायचा. वादळी वारे आले की लहान मुले सकाळीच पिशव्या घेऊन आमरायाकडे धूम ठोकत. काही वेळेतच पिशवीभर पाड घेऊन येत. वादळी वाऱ्यामुळे पडलेले पाडात वेगळीच मजा असे. गावागावांत सामायिक आमराया अस्तित्वात होत्या. शेतातील गावरान (mango tree) आंबे पिकवण्यासाठी गव्हाचे काड, भूशाचा वापर होत असे. आठ-दहा दिवसांनंतर पिकू घातलेले आंबे पिवळे धमक होऊन साखरेलाही फिके पाडेल, अशी चव चाखावयास मिळत असे. मात्र अलीकडील काळात उत्पन्नाची वाढती लालसा, वातावरणाचा बदलामुळे निसर्गाचा समतोल बिघडले. एकंदरीत आमराया दुर्मिळ झाल्याने सर्वांचा ओढा निलम, हापूस, केशरकडे वाढल्याचे पाहावयास मिळते.