हिंगोली (Hingoli District) : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी संबंधित विभागाची तात्काळ बैठक घेऊन आवश्यक ती कारवाई करावी यासाठी हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी मंगळवारी राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् (Governor Radhakrishnan) यांची भेट घेतली.
आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी बुधवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् (Governor Radhakrishnan) यांची भेट घेऊन (Hingoli District) हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा विषय उपस्थित केला. यावेळी राज्यपालांना माहिती देतांना आ. मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी सांगितले की, हिंगोली जिल्हा सिंचनाच्या बाबतीत राज्यात सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर येतो. यापूर्वी जिल्ह्यात केवळ ११ टक्के सिंचन होते. परंतु २०१७मध्ये तत्कालिन राज्यपाल व्ही. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर ऐवढा सिंचनाचा अनुशेष असल्याचे मान्य केले होते.
त्या अनुषंगाने काही कामेही जिल्ह्यात झाली होती. पुढे मात्र जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी कोणताही विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला नसल्याचे आ. मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी राज्यपालांना सांगितले. (Hingoli District) याकरीता सर्व संबंधित विभागांची तातडीची बैठक घेऊन जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणण्यासाठी कृति आराखडा तयार करण्याची मागणीही आ. मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी केली. यावेळी आ. राजू नवघरे, शामराव देशमुख, छत्रपती गडदे, सौ. राजामती मुटकुळे, हिम्मत राठोड व इतरांची उपस्थिती होती.