स्वखर्चाने सामुदायिक विवाह 16 आयोजित करणाऱ्या सय्यद इमरान अली यांचे अजितदादांनी केले कौतुक
वसमत (Ajit pawar) : स्वतःच्या खर्चातून समाजातील गरजू माता पितांच्या मुला मुलींचे विवाह लावून देऊन सामाजिक कार्य करण्याचा आदर्श वसमत येथे सय्यद इमरान यांनी ठेवला आहे हे अनोखे उदाहरण आहे सय्यद इमरान अली यांच्या या (Muslim Samaj) सामाजिक कार्याची प्रेरणा इतरांनीही घ्यावी व गोरगरिबांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit pawar) यांनी केले. सामुदायिक विवाह सोहळ्याचे संयोजक सय्यद इमरान अली यांचे अजित दादांनी तोंड भरून कौतुक केले.
वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद इमरान अली सय्यद नासरअली यांच्या पुढाकारातून आणि आमदार राजू पाटील नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत येथे (Muslim Samaj) मुस्लिम समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 29 विवाह लावण्यात आले.
गेल्या वर्षी सुद्धा सय्यद इमरान अली यांनी त्यांच्या पुढाकाराने 26 विवाह पार पडले होते शनिवारी वसमत येथे पार पडलेल्या या इस्तेमाई शादीया
या सोहळ्यात (Muslim Samaj) मुस्लिम समाजातील 29 जोडपे विवाहबद्ध झालं या विवाहाचा संपूर्ण खर्च सय्यद इमरान अली वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला विवाहासाठी लागणारा संपूर्ण खर्च वधू-वरांसाठी कपडे , संसारासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मोफत भेट म्हणून देण्यात आल्या आमदार राजू पाटील नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सय्यद इमरान अली यांच्या पुढाकारातून मुस्लिम समाजाचा हा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत माजी मंत्री नवाब मलिक आमदार विक्रम काळे आमदार राजू पाटील नवघरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit pawar) यांनी विवाह सोहळ्यास हजेरी लावून वधू-वर शुभाशीर्वाद दिले. तसेच स्वखर्चाने सामाजिक जाणिवेतून सामुदायिक विवाह सोहळा घेणाऱ्या सय्यद इमरान अली यांचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना अजितदादा म्हणाले स्वतःच्या खिशातून खर्च करणे फार अवघड असते समाज कार्य करणारे अनेक जण पाहिले. मात्र स्वतःच्या खिशातून खर्च करून स्वतःच्या बहिणीचा मुलीचा विवाह केल्यासारखा सामुदायिक विवाह सोहळा करणारा पहिल्यांदा पाहिला सय्यद इम्रान अली यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे त्यांचे कार्य खरे सामाजिक कार्य आहे. या कार्याचा आदर्श इतरांनी घेऊन समाजातील गोरगरीब गरजू यांना मदतीचा हात दिला तर समाजातील दरी मिटण्यास मदत होईल असे यावेळी अजितदादा पवार (Ajit pawar) यांनी सांगितले.
सय्यद इमरान अली यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे गेल्या वर्षी 26 विवाह तर यावर्षी 29 विवाह घेण्यात आले आहेत. ही परंपरा कायम ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी सय्यद इमरान अली यांनी केला. आमदार राजू पाटील नवघरे यांच्या सामुदायिक विवाह सोहळा घेण्याच्या कार्याची प्रेरणा आपण घेतली व त्यातूनच प्रेरणा घेऊन (Muslim Samaj) मुस्लिम समाजातील सामाजिक विवाह सोहळा ही संकल्पना पुढे आली असल्याचे सय्यद इमरान अली यांनी सांगितले. आमदार राजू पाटील नवघरे यांची समर्थ साथ आहे. त्यामुळे थोडा मोठा सामाजिक सोहळा पार पडत असल्याचे सय्यद इम्रान अली यांनी सांगून पुढच्या वर्षी किमान 50 विवाह होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.