निलंगा (Raj Thackeray) : निलंगा येथे २००८ मध्ये तत्कालीन मनसे कार्यकर्त्यांकडून एसटी महामंडळाच्या गाडीची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निलंगा (Nilanga court) येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी (ता.30) अजामीन पात्र अटक वॉरंट जारी केले आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर निलंगा येथे झालेल्या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड, जाळपोळ केली होती. या प्रकरणात राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव आरोपी म्हणून आठव्या क्रमांकावर होते.
यापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना या प्रकरणात निलंगा न्यायालयात (Nilanga court) हजर राहावे लागले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने त्यांना पुन्हा निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. २००८ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले होते.
निलंगा येथे तत्कालीन मनसे कार्यकर्त्यांकडून एसटी महामंडळाच्या गाडीची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. २००८ मध्ये निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी उदगीर मोडवरती (फाटा) महामंडळाच्या बसची जाळपोळ केली होती. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात आठ जणावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता.
यापूर्वी निलंगा न्यायालयाने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा जामीन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर रहावे लागले होते. शिवाय त्यांच्या वकीलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती. शिवाय त्यांना जामीनही दिला होता. मात्र तारखेला हजर राहात नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा मनसे राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
या प्रकरणातील तत्कालीन तालुका प्रमुख व इतर तिघे काल शुक्रवारी रोजी न्यायालयात ह(Nilanga court) जर झाले होते.त्यांच्याविरोधात काढलेले वॉरंट तामील झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने चौघांचा जामीन रद्द केला होता. पुन्हा न्यायालयाने दंड लावला व नवीन जामीन देण्याचा आदेश चौघांना दिला होता. रितसर वकिलामार्फत काल जामीन मिळाला आहे.मात्र राज ठाकरे व मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय साळुंके हजर राहत नसल्यामुळे त्यांच्याविरोधात पुन्हा अजामीन पात्र वॉरंट जारी केले असल्यामुळे पोलिसांना राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे. येथील न्यायालयाने राज ठाकरे व अभय साळुंके यांना हजर करा, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सहा वर्षानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांना निलंगा न्यायालयात (Nilanga court) हजर रहावेच लागणार आहे.