निलंगा तालुक्यातील उस्तुरीची घटना
कासारशिरसी (Nilanga Crime ) : शेतीच्या वादातून सख्या तीन भावांनी अचानक लाठ्या-काठ्यांनी केलेल्या हल्ल्यात मोठा भाऊ व पुतण्या जागीच ठार झाले. निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
माहितीनुसार, उस्तुरी येथील सुरेश बिराजदार यांचा व सख्खे भाऊ बसवराज बिराजदार, सुनील बिराजदार, लखन बिराजदार यांचा शेतीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून चालू होता. या विषयावर अनेकदा यांची भांडणे झाली होती व एकमेकांविरोधात गुन्हेही दाखल झाले होते. (Nilanga Crime) गावातील अनेकजणांनी या सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; पण यातील कोणीही ऐकण्यास तयार झाला नाही. यातच गुरुवारी (दि.१६) मयत सुरेश बिराजदार, मुलगा गणेश व साहिल शेतात काम करीत होते.
यावेळी बसवराज बिराजदार, सुनील बिराजदार व लखन बिराजदार यांनी लाठ्या-काठ्यांसह अचानक येऊन मारहाण चालू केली. बेसावध असणारे पितापुत्र तिघेही अचानक झालेल्या मारहाणीमुळे सावध होण्यास वेळ मिळाला नाही. या (Nilanga Crime) तिघांनी केलेल्या जबर मारहाणीत सुरेश बिराजदार (वय ५० वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला व मुलगा साहिल (वय २२ वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा गणेश बिराजदार हा गंभीर जखमी झाला असून त्याला ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अजय पाटील, पोलीस अमित गायकवाड, ज्ञानोबा शिरसाट, राजु हिंगमिरे, बळीराम म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार व लखन बिराजदार यांना अटक करुन पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत (Nilanga Crime) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.