मुख्याधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या प्रवेशव्दाराला कुलूप कुलूप लावल्यावर उघड झाला प्रकार
औंढा नागनाथ (Aundha Nagar Panchayat) : नगर पंचायत मधील लेट लतिफ कर्मचारी बुधवारी कार्यालयात येण्यापूर्वीच (Aundha Nagar Panchayat) प्रभारी मुख्याधिकारी गणेश गांजरे यांनी प्रवेशव्दाराला कुलूप ठोकल्याने किती कर्मचारी उशिराने येतात हा प्रकार उघड झाल्याने १५ लेट लतिफ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
औंढा नागनाथ येथील (Aundha Nagar Panchayat) नगर पंचायत मधील कार्यरत कर्मचारी नेहमीच उशिराने कार्यालयात येत असल्याच्या तक्रारी वरून नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी गणेश गांजरे यांनी बुधवारी सकाळी ९ वेळेच्या आत केवळ दोन ते तीन कर्मचारीच कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी गेट ला कुलूप लाऊन गेट बंद केल्यामुळे उशीरा आलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर ताटकळत उभे रहावे लागले, कार्यालयीन वेळ होऊन देखील अनेक कर्मचारी उशिराने येत असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याच्या तक्रारी वरून (Aundha Nagar Panchayat) नगरपंचायतचे मुख्यधिकारी गणेश गांजरे यांनी १६ एप्रिल बुधवार रोजी सकाळी लवकरच कार्यालय गाठले आणि नगर पंचायतच्या मुख्य इमारतीचे प्रवेशद्वारे सकाळी ९:५० वाजता बंद करून त्यांना कुलूप लावण्याचे आदेश दिले मुख्याधिकारी येणार असल्याचे माहिती नसल्यामुळे सवयी नुसार कार्यालयात उशिरा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या गेटला कुलूप लावलेले बघून कर्मचारी काहीवेळ गोंधळात पडले. मुख्याधिकारी गणेश गांजरे यांनी कुलूप लावले असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना कळताच त्यांना धक्का बसला, व मुख्याधिकारी बाहेर येईपर्यंत त्यांना प्रवेशद्वाराबाहेर ताटकळत उभे रहावे लागले.
बऱ्याच वेळा नंतर (Aundha Nagar Panchayat) मुख्याधिकाऱ्यांनी प्रवेशद्वाराजवळ येऊन उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. कर्मचारी यांनी सकाळी ९:४५ वाजता इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या आत येणे बंधनकारक राहिल. अतिमहत्वाच्या कामामुळे अथवा अपवादात्मक परिस्थितीत कार्यालयात येण्यास विलंब होणार असल्यास सकाळी ९:३० वाजण्यापूर्वी विभाग प्रमुखांनी मुख्याधिकारी यांना वैयक्तिकरित्या व ईतर कर्मचारी यांनी नगरपंचायत कार्यालय या व्हाट्सअप ग्रुपवर कारणांसह बंधनकारक असल्याच्या सूचना करून कार्यालयाबाहेर ताटकळत उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांना आत घेतले.
या दरम्यान सकाळी कामानिमित्ताने नगरपंचायतीत आलेले नागरिक देखील गेटला कुलूप असल्याने बाहेरच ताटकळत थांबावे लागले होते. लेट लतीफ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने इतर कर्मचारी एकच खळबळ उडाली आहे.