रिसोड (Risod) :- भरधाव कारणे तिघा पादचाऱ्यांना उडवल्याची घटना दिनांक 26 एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता रिसोड वाशिम मार्गावर चिखली फाट्याजवळ घडली. या घटने मध्ये एकाचा मृत्यू तर दोघेजण जखमी झाले असून यामध्ये एक शेळी सुद्धा ठार झालेली आहे. पुंजाजी हरिभाऊ काळे वय 51 वर्ष राहणार चिखली ता. रिसोड असे मृतकाचे नाव असून याबाबत स्वाती पुंजाजी काळे यांनी दिनांक 27 एप्रिल रोजी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे वडील पुंजाजी काळे हे मजुरीचे काम आटोपून चिखलीकडे येत होते.
भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिघांनाही उडवले
यादरम्यान त्यांच्यासोबत प्रकाश भीमराव भगत व भास्कर टेकाळे हे सुद्धा पायी येत होते. सात वाजताच्या दरम्यान वाशिम च्या दिशेने रिसोडच्या दिशेकडे येत असलेली भारधाव कार क्रमांक एम एच 14 बि आर 2502 चे चालक केशवराव साहेबराव देशमुख वय 54 वर्ष राहणार मोठेगाव तालुका रिसोड जिल्हा वाशिम यांना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिघांनाही उडवले. यामध्ये पुंजाजी काळे यांचा घटनास्थळीच मृत्यू (Death) झाला तर अन्य दोघा जखमींना वाशिम येथील ग्रामीण रुग्णालयात (hospital) उपचारार्थ भरती करण्यात आले. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी कार चालक केशवराव साहेबराव देशमुख यांचे विरोधात कलम 281, 125 (ए), 125 (बी), 106 (1) बी एन एस नुसार गुन्हा (Crime) दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर नागरे हे करीत आहेत.