पश्चिम बंगालमधील घडवून आणलेली दंगल
पहलगाम येथे अतिरेक्याने केलेला हल्ला
पहलगाम येथे अतिरेक्याने केलेला हल्ला
हिंगोली (Pahalgam Terrorist attack) : पश्चिम बंगालमध्ये घडवून आणलेली दंगल व कश्मीरच्या पहेलगाममध्ये अतिरेक्याने केलेला भ्याड हल्ला याचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान तर्फे निषेध नोंदविण्यात आला.
या प्रकरणी २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात पश्चिम बंगालमधील बांंगला देशच्या सरहद्दीत सलग्न असणारे अनेक जिल्हे भारताच्या विरोधात देशद्रोही काम करीत आहेत. या ठिकाणी हिंसात्मक कारवाई करून अनेक हिंदू माता भगीणीवर मुस्लिम अराजकाने अत्याचार केले आहे. तसेच हिंदूचे दुकाने, मालमत्ता जाळून टाकण्यात आली आहे. त्याच प्रमाणे (Pahalgam Terrorist attack) कश्मीरमधील पहेलगाममध्ये २२ एप्रिल रोजी अतिरेक्याने भ्याड हल्ला करून २७ जणांना ठार मारले. विशेष म्हणजे धर्म पाहून त्यांना ठार मारण्यात आले आहे. असा हल्ला परत घडू नये अन्यथा रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देवू असा इशारा श्री. शिवपतिष्ठान हिंदूस्थानचे (Shiv Pratisthan Hindusthan) जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी दिला आहे.
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी
पश्चिम बंगालमध्ये सर्रास हिंदूच्या वस्त्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे या भागातील हिंदू भयभीत झाले आहेत. उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप झाल्याने वेळेत केंद्रीय फौजा तेथे आल्यामुळे हिंदूचे होणारे मोठे हत्याकांड टळले. या ठिकाणी कित्येक (Shiv Pratisthan Hindusthan) हिंदू विस्थापिताचे आयुष्य जगत आहेत. त्यांच्या मनात भिती व असुरक्षितची भावना निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी श्री. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान तर्फे करण्यात आली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्यासह राम हराळ, निखील शिंदे, अमृत महाराज पडघन, निलेश चव्हाण, विश्वनाथ बिरगड, बालाजी पोले, दशरथ पवार, सुनिल काळे, हरि कोरडे, पवन कसबे, भोला चव्हाण, पांडुरंग पोले आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.