Parbhani case :- तालुक्यातील माळसोना गावामध्ये हृदयाला पिळून टाकणारी घटना घडली आहे याची अधिक माहिती दिनांक14 एप्रिल रोजी आपल्या राहत्या घरी सचिन बालाजी जाधव यातरुण शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज (Bank loan) व बहिणीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून कीटकनाशक (Insecticide) घेऊन आत्महत्या (Suicide) केली होती. त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला होता.
दैठणा हद्दीतील मालसोंना येथील घटना..!
दिनांक 15 रोजी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. त्याच दिवशी पत्नीने सोशल मीडियावर पतीच्या मृत्यूची (Death) बातमी पाहून पत्नी ज्योती जाधव हिनेही कीटकनाशक प्राशन केले व त्यांनतर ज्योती जाधव यांच्यावरदेखील परभणी व नंतर नांदेड येथे उपचार सुरू होते. उपचारदरम्यान मंगळवार रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांची ज्योत मावळली तरुण पती-पत्नी आत्महत्या करून मृत्यू पावल्यामुळे माळसोना गावावर शोककळा खकळा पसरली असून दोन चिमुकल्या आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे पोरक्या झाल्या. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




