परभणी/जिंतूर(Parbhani) :- बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे आदर्श सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण खून (Atrocious murder)केलेल्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कडक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी दिनांक 19 डिसेंबर रोजी भव्य आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रचंड घोषणाबाजी करत आरोपीवर कडक कार्यवाहीची मागणी
बिड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे भर दिवसा अपहरण (Kidnap) करून निर्घृण हत्या करत माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने पूर्ण समाजमन ढवळुन निघाले आहे संपूर्ण बिड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रात असुरक्षिततेचे सावट आहे. घडलेल्या गुन्ह्याची व्याप्ती बघता कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलिसच गुन्हेगाराना पाठीशी घालत आहेत. शिवाय गुन्हेगावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्ह्यातील आरोपी आजही फरार आहेत म्हणून घटनेचा निषेध करून गुन्ह्यातील सर्व आरोपीना अटक करावी, घटनेचा मुख्यसूत्रधार शोधावा, खून (Murder)खटला जलदगती न्यायालयात चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी भव्य आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदरील मोर्चा बाजार समितीच्या मैदानांवरून मुख्य चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक येथून राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालया समोर मोर्चा धडकला. यावेळी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत येत्या काही दिवसात सर्व आरोपी अटक झाले नाही तर आंदोलन तीव्र करणार असल्याचे दिसून आले.