परभणी (Parbhani) :- पूर्णा तालूक्यातील फुकटगाव येथील एका शेतकर्याचा कान्हेगाव शिवारातील एक एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे (short circuit) शनिवारी दुपारी जळाला.यात शेतकर्याचे प्रचंड नुकसान झाले असुन संभाव्य ७० टन ऊस आगीत खाक होऊन २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकर्याचे दोन लाखांचे नुकसान; नुकसान भरपाई देण्याची मागणी
याबाबत अधिक माहिती असी की, पूर्णा तालूक्यातील खुजडा येथील रहिवासी शेतकरी भिमराव केरबा रणवीर यांची कान्हेगाव शिवारात गट क्रमांक ९१ मध्ये शेती आहे. त्यांनी मागील रब्बी हंगाम २०२४ मध्ये नवव्या महिन्यात ऊसाची लागवड केली आहे. सहा महिने काळात ऊसाची चांगली वाढ होवून पीक जोमदार अवस्थेत होते. यातच शेतातून गेलेल्या महावितरणच्या ११ केव्ही लोंबकळलेल्या विद्यूत तारात शनिवार १९ एप्रिल रोजी दुपारी अचानक शॉर्टसर्किट होवून ज्वालेची (जाळ) ठिणगी ऊसात पडली. ऊस पिकात (Sugarcane crop)तृण नाशक फवारणी करुन वाळलेला काडीकचरा व पाचटीने पेट घेतला आणि संपूर्ण एक एकर ऊस जळून होरपळून गेला. जळालेले ऊस पीक पून्हा उपयोगात घेऊ शकणार नसल्याने पीक वाया गेले आहे. आगामी काळात ७० टन संभाव्य ऊस उत्पादन बुडाल्यामुळे शेतकर्याचे २ लाख रुपयांचे नूकसान झाले आहे.
दरम्यान, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ११ केव्ही विद्यूत लाईनची तारा लोंबकळलेल्या असल्याने शॉटसर्किट घडले. अशा घटना पूर्णा तालूका परिसरात या आधी अनेक ठिकाणी घडून आल्या आहेत. शेतकर्यांचे उभे ऊस पीक जळून खाक झालेत. तरीही महावितरण कर्मचार्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन विद्यूत खांब व तारा सरळ केल्याच नाहीत. शेतकरी भिमराव रणवीर यांना महावितरण व महसूल खात्या मार्फत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकर्यांनी केली आहे.