तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन!
जिंतूर (Parbhani) : मागील पाच दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जारांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह सकल मराठा समाजातील नागरिकांचे सुरू असलेल्या उपोषणाची राज्य सरकारने दखल घेतलेली नसल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या (Maratha Society) वतीने दिनांक 31 जानेवारी बोंबमारो आंदोलन (Bombing Movement) करण्याचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिला आहे
मराठा समाजाचा सरसगट ओबीसी प्रवर्गात (OBC Category) समावेश करावा यासाठी 25 जानेवारी पासून अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण, महिला वयोवृद्ध व्यक्ती आमरण उपोषणाला (Fast Unto Death) बसले आहेत परिणामी अनेक आंदोलकांची तब्यत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. असे असताना राज्य सरकारने (State Govt) यांच्याकडे लक्ष देत नाही त्यांना आरोग्याचा सुविधा अपुऱ्या पडत आहेत म्हणून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत आहेत. म्हणून आगामी काही दिवसात सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून तत्काळ उपोषण सोडवावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून याची सुरुवात बोंबमारो आंदोलन करून करणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे या निवेदनावर सकल मराठा समाजातील नागरिकांच्या सह्या आहेत.