हिंगोली (Hingoli Lok Adalat) : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी महालोक अदालत घेण्यात आली यात २२३ प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. दरम्यान, सर्वोच्य न्यायालयाच्या वतीने शनिवारी २७ जुलै रोजी संपूर्ण भारतात महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विविध प्रकारचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले. यामध्ये मोटार वाहन अपघाताचे ८३ दावे निकाली काढण्यात आले, त्यापैकी अनुभवी वकील असलेले अँड. सुरेश गडदे यांनी ६५ प्रकरणे निकाली काढली आहेत.
यामध्ये लक्ष्मीबाई लूटे यांचा साठ लाखाचा दावा विमा कंपनीचे अँड. अजय व्यास , यानी आयसी आयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भारत केदारे , अमित यावलकर, सतपाल राजपूत, आशिष राऊत, यांच्या सहकार्याने निकाली काढले. यावेळी अँड. सुरेश गडदे, अँड. मनीषा गडदे, अँड. मुद्सिर, अँड. बालाजी जगताप, अँड. नितीन अर्धापुरकर ,अँड. पोले, अँड. लेकुळे यांनी इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यात मोलाची भूमिका बजावली. येथील न्यायालयात दिवाणी व फोउज दारी व इतर असे एकूण २२३ प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.