भंडारा (Bhandara):- जिल्ह्यात दोन-तीन दिवसात झालेल्या मुसळधार अतिवृष्टी (Heavy Rain)व संततधार पावसामुळे हाहाकार माजला. पूर परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले. अनेक तालुक्यांचा गावांशी संपर्क तुटला. नदी, नाले ओसंडून वाहत असून लगतच्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणात नदी पात्रात पाणी सोडले जात आहे.
पोकलॅण्ड मशिन पूरात गेली वाहून
परिणामी वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. परिणामी पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. बायपास महामार्गाचे बांधकाम सुरु असून वैनगंगा नदीवर पुलाच्या बांधकामाकरीता नदीपात्रात असलेली पोकलॅण्ड मशिन पूरात वाहून गेली. पोकलॅण्ड मशिनमुळे नदीपात्राच्या वरुन गेलेली हायहोल्टेज विद्युत तार(Electric wire) तुटल्याचे सांगितले जाते. अथक प्रयत्नाने बांधकाम स्थळापासून जवळपास ७-८ किमी.अंतरावर असलेल्या तिड्डी शिवारात वाहून जात असलेल्या पोकलॅण्ड मशिनला (Pokland Machine) नदीकाठावर काढण्यास यश आले.