महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग, व्यापाऱ्यांनी बंद ठेवली प्रतिष्ठाने
कारंजा/वाशिम (Hindu Samaj) : बांगलादेशमध्ये हिंदू समाजबांधवांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ३१ ऑगस्ट रोजी शहरात सकल हिंदू समाज बांधवांच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो हिंदू समाज बंधू-भगिनी सहभागी झाले होते. बांगलादेशमध्ये (Hindu Samaj) हिंदू महिला व पुरुषांवर अत्याचार झाले. तसेच भारतात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मुलींना फुस लावून पळवून नेले जात आहे. लव जिहाद प्रकरण वाढत असल्याने हिंदू महिला संकटात सापडल्या आहेत.
या सर्व घटनांना आळा बसावा. तसेच या घटनांचा निषेध म्हणून (Hindu Samaj) सकल हिंदू समाजबांधवांच्या वतीने स्थानिक श्रीराम मोठे मंदिरपासून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. स्थानिक रामासावजी चौक, महात्मा फुले चौक, भगवान महावीर मार्ग, जयस्तंभ चौक येथून निघालेल्या मोर्चात असंख्य महिला व पुरुष हातात भगवे ध्वज, हाताला काळी पट्टी व महिला अत्याचाराच्या निषेधाचे फलक घेवून सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा अशा घोषणांनी शहराचा आसमंत दणाणून गेला होता.