नवी दिल्ली/ मुंबई (RBI Bank) : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसाठी खूप महत्त्वाची बातमी समोर अली आहे. मुंबई स्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने (RBI) अनेक कडक निर्बंध लादले आहेत. बँकांमधून रोख रक्कम काढण्यासह व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे. ही माहिती मिळताच (India Co-op Bank) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांमध्ये घबराट पसरली. शेकडो लोक बँक कार्यालयात पोहोचले. बँकेबाहेर लोकांच्या लांब रांगा आहेत.
13 फेब्रुवारी 2025 पासून लागू झालेल्या या निर्बंधांअंतर्गत, (RBI Bank) आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला (India Co-op Bank) कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यास, कोणत्याही नवीन ठेवी स्वीकारण्यास आणि ग्राहकांना ठेवी परत करण्यास मनाई केली आहे. शिवाय, बँक यापुढे कोणतेही नवीन कर्ज मंजूर किंवा नूतनीकरण करू शकणार नाही, ज्यामुळे तिच्या ग्राहकांना मोठी गैरसोय होणार आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: People gather outside the New India Co-operative Bank after the RBI issued a notice to halt all business pic.twitter.com/kkzXmCIMqe
— ANI (@ANI) February 14, 2025
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी का?
आरबीआयच्या मते, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक स्थितीत आणि कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. ज्या दुरुस्त करण्यासाठी आरबीआयने (RBI Bank) हे पाऊल उचलले आहे. आरबीआयने स्पष्टपणे सांगितले की, ते बँकेच्या कामकाजाची सखोल चौकशी करेल आणि या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई करेल. निर्बंधांनंतर, (India Co-op Bank) बँकेला फक्त पगार, भाडे आणि वीज बिलांसारखे काही आवश्यक खर्च भरण्याची परवानगी असेल.
बँकेबाहेर लांब रांगा
आरबीआयच्या (RBI Bank) या बंदीनंतर, मुंबईतील अंधेरी येथील विजयनगर शाखेबाहेर खातेदारांची मोठी गर्दी जमली. ग्राहकांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्टपणे दिसून येतात. ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत कधी मिळतील, याची चिंता आहे. काही ग्राहकांनी तक्रार केली की, (India Co-op Bank) बँका त्यांना काहीही सांगत नाहीत. बँकेच्या ग्राहक सेवा आणि मोबाईल अॅप्स देखील काम करत नाहीत.




