कोरची (Korchi Forest Fire) : या तालुक्यातील जंगलातील करोडो किमतीची वनसंपदा जळून खाक होत आहे. प्रशासनाचे याकडे पुर्णतः दुर्लक्ष होत आहे. कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात सर्वच प्रकारच्या वनस्पती आहेत. साग,बिजा, मोह, हीरडा, बेहळा, जांभूळ, तेंदू. अशा विविध प्रकारची झाडे आहेत. तेंदूच्या पानापासून बिडी तयार करतात. या (Korchi Forest Fire) तालुक्यातील तेंदू पत्त्याला बिडी तयार करण्यासाठी बाजार पेठेत मोठी मागणी आहे. तेंदू पत्ता संकलन करण्यासाठी मोठ मोठ्या शहरातील ठेकेदार या तालुक्यात येतात. प्रती गोणी हजार रूपया पेक्षा रक्कम देऊन खरेदी करतात. हा व्यवसाय मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
पुर्वीच्या काळी, 10/12 वर्षापूर्वी मार्च महिन्यात तेंदूपत्ता ठेकेदार, गावागावातील लोकांच्या मोकळ्या जागेतील तेंदू पत्त्याची कटाई करायचे. त्याला खुटकटाई म्हणत.पर्यावरणाचा विचार करून खुटकटाई जंगलात करीत नव्हते. (Korchi Forest Fire) खुटकटाई झाल्यावर तेंदू ची पाने चांगल्या प्रतीचे मिळायचे. त्यानंतरच्या काळात पाच सहा वर्षापासून खुटकटाई करण्यात पैसा गुंतविणे ठेकेदार कंजुषकी करू लागले.
त्यापेक्षा ठेकेदारांकडून नियुक्ती केलेले दिवानजी, चेकर लोकांना सांगुन जंगलांना आगी लावल्या जातात. त्यामुळे मोकळ्या जागेतील पालापाचोळ्यासह अख्खे जंगल जळते. जळालेल्या भागात तेंदूची पाने अधिक जोमाने व चांगल्या दर्जाचे तयार होतात. त्यामुळे (Korchi Forest Fire) तेंदू पत्ता ठेकेदार जंगल जाळतात.असे नागरिक बोलतात. 2020-21 ते 2022-23 च्या दरम्यान देशात कोरोना होता. त्यामुळे पत्ता लिलाव करण्यात आला नाही. त्यावर्षी कोणत्याच परिसरातील जंगल जळाले नाही.जसा कोरोना संपला, जंगलांना आगी लावने सुरू झाले.
जंगल जळत असताना ते विझविण्यासाठी वन विभागाकडे खास आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आग विझविण्यासाठी यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. कुणीही वाटसरू बिडी पिऊन वाटेच्या वाजूला माचीसची काळी फेकू नये, ज्यामुळे (Korchi Forest Fire) जंगलांना आगी लागेल, त्यासाठी दरवर्षी रस्त्याच्या बाजूला असलेले झाडे झुडपे जाळली जातात.
मार्च महीन्यातच या भागातील लोक मोह वेचणी करतात. मोह वेचता यावी म्हणून लोक (Korchi Forest Fire) मोहाच्या झाडाखालील पालापाचोळा जाळतात. झाडाखालील पालापाचोळा जळाल्या नंतर आग विझविल्या जात नाही. ती आग वाढत जाते व पुर्णतः जंगल पेट घेतो. गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारी गोंदिया जिल्हा आहे. या जिल्ह्यात मोह वेचणाऱ्या लोकांना जाळी दिले आहे. ती जाळी मोहाच्या झाडाखाली बांधून जाळी वर मोह पाडतात. त्यामुळे जंगल जाण्यापासून वाचतो. जंगल जाळल्यामुळे जंगलातील मौल्यवान झाडे, वन औषधी, गवत, गवतावर जगणारे किटक, प्राणी, पक्षी, गवत खाणाऱ्या प्राण्यांवर अवलंबून असणारे हिंस्र प्राणी, सर्वच प्राणी आणि वनस्पती वर याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो.
एवढेच नव्हे तर पर्यावरणात कार्बन डायॉक्साईड चे प्रमाण वाढते. त्यामुळे मार्च महिन्यात तापमान 40 अंशापर्यंत जातो. पाण्याची पातळी खालावते. एकंदरीत पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. पर्यावरण वाचविण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करने महत्त्वाचे असताना याकडे लक्ष देण्यासाठी कुणाकडे वेळ नाही. (Korchi Forest Fire) वनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी शासनाने ग्रामसभांना दिले आहे. तेंदूपत्ता व्यतिरिक्त वन संवर्धनासाठी कोणतेही काम करताना दिसत नाही. कृत्रीम वनवे विझविण्यासाठी वनविभागाने लाखो रुपयाचा निधी आणि यंत्रसामग्री येते. परंतु उपयोग शुन्य आहे. अजून वेळ गेली नाही. वेळीच यावर योग्य उपाय केले नाही तर पृथ्वी जास्त दिवस वाचणार नाही.




