नवी दिल्ली(New Delhi):- T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ (Indian team)आज, 4 जुलै रोजी बार्बाडोसहून दिल्लीला पोहोचला आहे. सकाळी 6.10 वाजता दिल्लीच्या IGI विमानतळावर (Airport)उतरल्यानंतर टीम इंडियाचा मुक्काम हॉटेल ITC मौर्यामध्ये आहे. भारतीय खेळाडू तेथे काही काळ विश्रांती घेतील आणि त्यानंतर सर्व खेळाडू आणि
सपोर्ट स्टाफ सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींची(Prime Minister Modi) भेट घेतील. 2024 च्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा(South Africa) 7 धावांनी पराभव करत 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. चॅम्पियन(champion) बनल्यानंतर बार्बाडोसमधील चक्रीवादळामुळे संघ तिथेच अडकला आणि त्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला विशेष चार्टर फ्लाइटद्वारे दिल्लीला रवाना केले. चॅम्पियन बनल्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या भारतीय संघाचे आज सकाळी विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. टीम इंडियाचे खेळाडू आणि ट्रॉफीची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते.