शाबरी कवच सहस्त्रवर्तन सोहळा
नागपूर (Shabri Kavach Sahastravartan ceremony) : सर्व भौतिक समस्यांचा उपाय आपल्याच जवळ आहे. मानसिक शक्तीला प्रेरित करून, आपल्या धर्माचा अभ्यास आणि मनन-चिंतन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. नास्तिकतेच्या नावाखाली धर्माच्या रूढीपरंपरांना हद्दपार न करता, त्यांच्या रचनेमागील शास्त्रशुद्ध दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः विज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवणार्या युवा पिढीने तर आपला विज्ञानाधिष्ठित धर्म समजून घेण्याचा आग्रह धरावा, असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे अभ्यासक आणि मार्गदर्शक मुकुंददादा अंधारे (Mukundadada Andhare) यांनी केले.
श्री मुकुंद दादा अंधारे नवनाथ शक्तिपीठ’ (Navnath Shaktipeeth) ट्रस्टच्या वतीने आयोजित शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळ्यात उपस्थित भाविकांना त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने मार्गदर्शन केले. ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’ हे हिंदू धर्माचे मूळसूत्र नव्या संदर्भासह समजावून देत त्यांनी धर्माविषयीच्या उपलब्ध साहित्याचा अभ्यास करण्याचा आग्रह धरला. रवींद्र सभागृहाच्या समोर, रवींद्रनगर येथे हनुमान मंदिराच्या सभामंडपात झालेल्या या कार्यक्रमाला ठिठिकाणाहून आलेले भक्त आवर्जून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत करकरे आणि पदाधिकारी दिनकर देशपांडे यांच्यासह ज्येष्ठ नाथभक्त हर्षलता नाईक यांची विशेष उपस्थिती होती.
‘शाबरी कवच’ हा नाथ संप्रदायातील (Nath Sampraday) प्रभावी असा बीजमंत्रांचा समूह असून त्याचे प्रभावी परिणाम भाविकांनी प्रत्यक्ष अनुभवले आहेत. या कार्यक्रमात मुंबईहून आलेल्या कुडतरकर दाम्पत्यासह मंगेश मेश्राम यांनी आपले प्रभावी अनुभव यावेळी कथन केले. सहस्त्रावर्तन सोहळ्यापूर्वी ‘किमया’ या त्रैमासिकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकातून श्रीकांत लिमये यांनी या आयोजनामागे ‘स्व-जन हिताय, स्व-जन सुखाय’ हा व्यापक दृष्टिकोन असल्याचे स्पष्ट केले. (Navnath Shaktipeeth) नवनाथ शक्तिपी’ ट्रस्टच्या कार्याची माहिती पदाधिकारी प्रशांत मोडक (Prashant Modak) यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन श्रद्धा वैद्य यांनी केले. शाबरी मातेची आरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला.




