रिसोड (Washim):- महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधव हा सुजलाम सुफलाम व्हावा हा उद्धात हेतू समोर ठेवून राज्यात मुख्यमंत्री कुसुम सोलर योजना व मागेल त्याला सोलर योजना तसेच आपल्या शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अशा अनेक कल्याणकारी योजना शेतकरी (Farmer)बांधवांकरिता आमलात आणलेल्या आहे.
महत्त्वाच्या हंगामावर उद्भवणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी
परंतु रिसोड तालुक्यामध्ये मागील अनेक महिन्यापासून अनेक शेतकरी बांधव या लाभाकरिता अर्ज करून पैशाचा भरणा करूनही समस्त शेतकरी बांधव या कल्याणकारी योजने पासून वंचित असल्याकारणाने सदर पुरवठा करणाऱ्या कंपनीला तसेच जिल्हा महाऊर्जा व्यवस्थापक व महावितरण कंपनीला जाब विचारून शेतकऱ्यांना या अतिशय महत्त्वाच्या हंगामावर उद्भवणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी भाजपा उत्तर भारतीय सचिव महाराष्ट्र राज्य लखन सिंह ठाकुर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Chief Minister Devendra Fadnavis) यांना पाठवलेल्या निवेदनात केले आहे.