परभणी (Parbhani):- जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी शुगर प्रा.लि.आडगाव (दराडे) येथील साखर कारखान्याच्या २०२४ – २५ हंगामाचे बॉयलर सोमवार २१ ऑक्टोबर रोजी पेटविण्यात आले. ऊस गाळपाचे हे तिसरे वर्ष असून जिंतूर, सेलू तालुक्यासह लगतच्या तालुक्यातील शेतकर्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
तालुक्यातील शेतकर्यांना मोठा फायदा..!
मागील दोन वर्षापासून श्री तुळजाभवानी शुगरच्या गाळपामुळे ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकर्यांचा ऊस कारखाना घेऊन जात असल्याने परिसरातील शेतकर्यांनी मोठया प्रमाणावर ऊसाची लागवड केली आहे. कारखान्याच्या चेअरमन भावना बोर्डीकर यांनीही शेतकर्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आहे. दरवर्षी कारखान्याची गाळप क्षमता वाढविली जात आहे. सोमवारी श्री तुळजाभवानी शुगरच्या तिसर्या गाळपाचे बॉयलर पेटविण्यात आले. बॉयलरचे पूजन अभिजीत बोर्डीकर व सौ.धनश्री बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, सौ.मिनाताई बोर्डीकर, आ.मेघना बोर्डीकर, चेअरमन भावना बोर्डीकर, टेक्निकल डायरेक्टर (Technical Director) व्यंकट कदम, भोयार, सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. तसेच शेतकरी, ऊस तोडणी ठेकेदार, वाहतुकदार व कर्मचारी उपस्थित होते.