नवी दिल्ली (Team India) : T20 विश्वचषकानंतर टीम इंडिया (Team India) जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. पाच सामन्यांच्या T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिल (Shubman Gill) या संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेतून सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. जे पहिल्यांदाच आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहत आहेत. मात्र या मालिकेपूर्वीच (Team India) टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
नितीशकुमार रेड्डी दुखापतीमुळे बाहेर
स्टार खेळाडू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) या पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिलेल्या माहितीनुसार, त्याला दुखापत झाली आहे. मात्र, दुखापतीचा प्रकार उघड झालेला नाही. (BCCI) बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. भारतीय संघ आणि खुद्द नितीश रेड्डी यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरणार आहे. रेड्डी मधल्या फळीत भारतीय संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. (Team India) एक वेगवान अष्टपैलू म्हणूनही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. सन रायझर्स हैदराबादकडून खेळताना नितीश रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांनी या आयपीएलच्या 13 सामन्यांमध्ये 303 धावा केल्या आणि 3 बळी घेतले. त्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाचे नुकसान होणार आहे.