Uttarpradesh Accident :- उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात (Accident)झाला आहे. कार आणि कँटर यांच्यात झालेल्या भीषण धडकेत पाच मजुरांचा मृत्यू (Death)झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह(dead body) ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
रात्री उशिरा इको कार आणि कँटरमध्ये जोरदार टक्कर
अलीगढच्या खेर कोतवाली भागात धान्य मार्केटसमोर रात्री उशिरा इको कार आणि कँटरमध्ये जोरदार टक्कर झाली. या अपघातात इकोमध्ये प्रवास करणाऱ्या पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच मजूर गंभीर जखमी झाले. जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात (Medical Colleges) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हरियाणातून भात पेरणी करून सर्व मजूर कारने पिलीभीत जिल्ह्यातील त्यांच्या घरी परतत होते. मृतदेह (dead body) पोस्टमॉर्टमसाठी(Postmortem) पाठवण्यात आले आहेत. जखमी आणि मृतांच्या नातेवाइकांना माहिती देण्याबरोबरच पोलीस पुढील कारवाईत व्यस्त आहेत. इग्लासचे सीओ डॉ. केजी सिंग यांनी सांगितले की, रात्री दीडच्या सुमारास कोतवाली खेर परिसरातील धान्य बाजारासमोर कँटर आणि ईको कार यांच्यात जोरदार धडक झाली.
कारमध्ये प्रवास करणाऱ्या पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला
या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अन्य पाच मजूर गंभीर जखमी झाले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने घटनास्थळ गाठून गाडीतील जखमी मजुरांना बाहेर काढले आणि उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. कारमधील सर्व मजूर पिलीभीत जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हरियाणातील धान पिकाची रोवणी करून हे मजूर कारने पीलीभीत जिल्ह्यातील त्यांच्या घरी परतत होते.