हिंगोली (Farmer Commits Suicide) : नापिकी व कर्जाला कंटाळून पेडगाव वाडी येथील शेतकर्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने बासंबा पोलिसात शुक्रवारी आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पेडगाववाडी येथील किसन रघुनाथ सातपुते (६६) या शेतकर्यास शेती असुन त्यावर कुटूंबीयाची उपजिवीका भागविली जात होती. शेतीवर त्यांनी मध्यंतरी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले होते. मागील काही वर्षापासून नापिकी होत असल्याने कर्ज कसे फेडावे या चिंतेत होते. यंदाच्या वर्षी खरिप हंगामात सोयाबीन व इतर पिके घेतली.
परंतु अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. २० नोव्हेंबर रोजी जनावरे चारण्याकरीता म्हणुन शेतात गेले होते. त्यांनी एका मजूराला जनावरे घरी घेऊन जाण्याकरीता सायंकाळी सांगितले. रस्त्यामध्ये असलेल्या एका विहिरीत उडी मारून त्यांनी (Farmer Commits Suicide) आत्महत्या केली. नेहमी प्रमाणे ते सायंकाळी घरी आले नसल्याने कुटूंबीयांनी शोध सुरू केला.
यावेळी एका विहिरीजवळ त्यांचा डब्बा व पायातील चप्पल दिसून आली. विहिरीत पाहणी केल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी सपोनि विकास आडे, पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार पोले, पंजाब लेकुळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. २१ नोव्हेंबरला बासंबा पोलिसात शिवाजी सातपुते यांंच्या माहितीवरून (Farmer Commits Suicide) आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. मयत किसन सातपुते यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.




