दोन समाजात द्वेष निर्माण करणार्यांना कठोर शिक्षा करावी
हिंगोली (Kuljamati Tanjim Andolan) : मागील काही दिवसापासून मुस्लिम समाजाच्या विरूद्ध हिंदू समाजातील लोकांना उद्देशून काहीजण प्रक्षोभक भाषणाद्वारे दोन समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात कलम वाढ करून दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी मुस्लिम संघटना कुलजमाती तंजीम यांच्यातर्पेâ शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर विराट आंदोलन करण्यात आले.
याप्रकरणी ११ ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्फत राष्ट्रपती, राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले की, महंत रामगिरी महाराज, नितेश राणे, यती नरसिंम्हानंद, आशिष देवसाणे यांनी पूर्वगृह दुषित बुद्धीने मुस्लिम समाज व प्रेरणास्थान प्रेशित मोहंमद यांच्या विरूद्ध अपमानकार वक्तव्य करून समाजाच्या विरूद्ध हिंदू समाजातील लोकांना उद्देशून प्रक्षोभक भाषण देऊन दोन समाजात द्वेष निर्माण करून देशाची एकता व अखंडता बाधीत केल्याने त्यांच्या विरूद्ध दाखल गुन्ह्यात कलमवाढ करावी, तसेच मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना मुफ्ती, सलमान अजहरी यांची कोठडीतून सुटका करावी, हिंगोली शहर ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात कलमवाढ करावी यासह इतर मागण्यांचा या निवेदनात उल्लेख करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुलजमाती तंजीम यांच्यावतीने अनेक वत्तäयांनी मनोगत व्यक्त केले. देशाची एकता व अखंडता कायम राहावी यासाठी निवेदनात दिलेल्या बाबीकडे लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोलिस प्रशासना तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.