वर्धा (Wardha) :- जम्मू कश्मिर येथील पलगाम येथील पर्यंटकांवर दहशतवाद्यांनी दि. २२ एप्रिल रोजी हल्ला केला. यामध्ये मृत्यु (Death) झालेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये वर्धा जिल्ह्यातील नागरीकांचा समावेश नाही. त्यामुळे नागरीकांनी काळजी करु नये.
जम्मू काश्मिर येथे पर्यंटनासाठी गेलेल्या नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने संपर्क देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील संपर्क झालेले सर्व ४५ पर्यंटक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. यातील ९ नागरिक श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत व ३६ नागरिक हॉटेल ब्राईट पॅलेस चंदन नगर पहलगाम येथे वास्तव्यास होते. हे सर्वजन सुखरुप असून जम्मूसाठी (Jammu)प्रस्थान केले आहे. जिल्हा प्रशासन भ्रमणध्वनीद्वारे संपर्कात असून सर्व नागरिकांच्या सुरक्षेची माहिती घेतली तसेच त्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक असलेले सर्व सहकार्य उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आलेले आहे.