- कपाशी दोन लाख तर सोयाबीन एक लाख ३५ हेक्टरमध्ये नियोजन
वर्धा (Wardha) : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्या अनुषंगाने नियोजनही शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. कृषी विभाग, जिल्हा प्रशासनाकडूनही याबाबत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कपाशी, सोयाबीन (Cotton, soybeans) ही मुख्य पिके राहणार आहेत. कपाशी, सोयाबीन, तूर ही मुख्य पिके राहणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात बियाणे, खत उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये (Wardha District) प्रामुख्याने तीन पीक मुख्य आहेत. त्यामध्ये कापूस, सोयाबीन आणि तूर ही पिके महत्त्वाची आहेत. जिल्ह्यातचार लाख ३३ हजार ३४० हेक्टर क्षेत्रात खरीप २०२४ हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन एक लाख ३५ हजार ८५० हेक्टर, कपाशी २ लाख २४ हजार ९५० हेक्टरमध्ये लागवड अपेक्षित आहे. तुरीचे ६५ हजार ५७० हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. हे तीन पिक मुख्य आहेत.
बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. शेकडो एकरातील सोयाबीन उदध्वस्त झाले
त्यासोबतच इतरही पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात भूईमुंग, ज्वारी, मुंग, उडीद, तीळ तसेच इतर पिकांच्या लागवडीचे नियोजन आहे. भूईमुंग ५०० हेक्टर, ज्वारी पाच हजार हेक्टर, मुंग, उडीद प्रत्येकी ५०० हेक्टर, तीळ ४० हेक्टर आणि इतर पिकांची लागवड ११८४ हेक्टरमध्ये अपेक्षित आहे. शेतकरी (farmer) सध्या खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त आहेत. शेतात मशागतीची कामे जोरात सुरू आहे. सध्या उन्हाळी तिळ सवंगणीची कामे सुरू आहेत. अनेक शेतात तिळाचे ढिग लागलेले आहेत. अवकाळी पाऊस, (unseasonal rain,) वादळामुळे मात्र त्यात अडथळे येत आहे. त्यामुळे ही बाब शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. शेतात असलेला काडीकचरा वेचून बैलबंडीने ट्रॅक्टर तसेच शेतीची वाहितीची कामे सुरू आहेत. मशागत करून शेती खरीप हंगामासाठी तयार करण्यात येत आहे. पण, पावसामुळे त्यात अडचणी येत आहे. अवकाळी पाऊस झाल्यानंतर मशागतीला आणखी विलंब होत असल्याचे चित्र दिसून येत आहे रशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. शेकडो एकरातील सोयाबीन उदध्वस्त झाले होते. शेतकऱ्यांना सोयाबीन तसेच सोडून द्यावे लागले होते. त्यामुळे यावर्षी सोयाबीनबाबत शेतकऱ्यांमध्ये विचार केल्या जात असल्याची परिस्थिती आहे.