Wardha: शहरातील भामटीपुरा परिसरात असलेल्या आनंद कम्प्यूटर्स (Anand Computers) दुकानामध्ये मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास अचानक आग (Fire) लागली. जवळपास चार ते पाच तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, या घटनेत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भामटीपुरा (Bhamtipura) परिसरात किमतकर यांचे आनंद कम्प्यूटर्स सेल्स अँड सर्व्हीस दुकान असून नवीन कम्प्यूटर्स, लॅपटॉप तसेच संबंधित विक्री आणि रिपेअरिंगचे (Repairing) काम केले जाते.
जवळपास पाच तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण
आनंद कम्प्यूटर्समधून मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास धूर निघत असल्याचे शेजार्यांच्या निदर्शनास आले. याबाबत दुकानाशेजारी घर असलेल्या किमतकर कुटुंबियांना माहिती देण्यात आली. सर्वांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वर्धा (Wardha) नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळ (Incident) गाठून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. भूगाव येथील अग्निशमन (Fire Fighting) दलानेही मदत कार्य केले. अग्निशमन दलाने जवळपास पाच फेर्या केल्यात. अंदाजे चार ते पाच तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. घटनेची शहर पोलिसांनी (Police) नोंद केली. आगीमध्ये नवीन कम्प्यूटर्स, लॅपटॉप (Laptop) तसेच ग्राहकांचे दुरूस्तीसाठी आणलेले कम्प्यूटर्स, लॅपटॉप आणि इतर साहित्य जळून खाक झाले. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.




