वाशिम (Washim) :- शहरातील शुक्रवारपेठ बाळ समुंद्र परीसरात दोन गटात चांगलाचा राडा झाला असून दोन्ही कडील युवकांनी एकमेकावर दगडाचा वर्षाव केला. मात्र या घटनेत कुणीच जखमी झाले नसले तरी परीसरात मात्र दहशत निर्माण झाली आहे. ही घटना १९ जूनच्या रात्री ९.३० च्या दरम्यान घडली.
या घटनेत कुणीच जखमी झाले नसले तरी परीसरात मात्र दहशत निर्माण झाली
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, बाळ समुंद्र व नारायण बाबा परिसरात राहणारे काही युवकांमध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवण्यावरुन आदल्या दिवशी बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर थेट बाळ समुंद्र परीसरात येऊन दगडफेकीत झाले. परिसरातील नागरीकांना मात्र अचानक दगड फेकीचा हा प्रसंग कशामुळे झाला. हे कळेनासे झाले. पोलिसांना या घटनेची माहीती मिळताच वाशिम शहर पोलिस स्टेशनचे (Police station) अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी येताच दोन्ही कडील युवक घटनास्थळावरुन पसार झाले. वास्तविक पाहता मोबाईलवर स्टेटस (status) ठेवण्यावरुन झालेला हा वाद भविष्यात मोठे स्वरुप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दोन्ही कडील युवक दगड फेक करतांना आक्रमक असल्याचे नागरीकांनी सांगितले. विशेष म्हणजे या राड्याच्या वेळी दगडफेकच नव्हे तर तलवारी देखील काढण्यात आल्या होत्या.
कदाचित वेळेवर पोलिस पोहचले नसते तर मोठी घटना शहरात घडली असती. पोलिसाच्या वतीने ३७ जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहीती आहे. मात्र या घटनेत दोन्ही कडील युवकांची संख्या जास्त असल्याने सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिस करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेतल्यास बरेच काही बाहेर येण्याची शक्यता आहे.
सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिस करीत आहेत
या घटनेने सध्या या भागात तनावपुर्ण शांतता असून परिस्थीती पुर्व पदावर असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. या घटनेतील आरोपी तसेच घटनेची पार्श्वभुमी निश्चित शोधल्या जाईल आणि त्यानुसार आरोपीवर कडक कारवाई केल्या जाईल. अशी माहीती पोलिसांनी दिली. सदर परिसरातील शांतता भंग करून दहशत निर्मान केली, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. अशा फिर्यादीहून उपरोक्त आरोपी विरुद्ध कलम १९४(२), १८९(२), १८९(४), १९०,१९१(२), १९१(३) भारतीय न्याय संहीता, सहकलम ७ क्रिमीनल लॉ अँमेटमेंट १९३२, सहकलम ४,२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.




