चंद्रपूर (Chandrapur Municipal Corporation) : चंद्रपूर शहरात भीषण उन्हाळ्याच्या झळांनी पाण्याचा तुटवडा तीव्र बनला असून, सध्या महानगर पालिका क्षेत्रात दररोज १२ पाण्याचे टँकर पाणी पुरवठ्यासाठी धावपळ करत आहेत. नैसर्गिक जलस्रोत आटत चालल्यामुळे अनेक प्रभागांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
महानगर पालिकेकडून (Chandrapur Municipal Corporation) शहरातील बहुतेक भागांमध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळाच पाणी उपलब्ध होत आहे. काही ठिकाणी नागरिकांना लांब अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आणि वृद्धांमध्ये त्रासदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाणी टंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, ‘पाणी मिळवण्यासाठी रांगा, वाद, तक्रारी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत,’ असे चंद्रपूर शहरतील पाण्यााठी रांगेत उभे राहावे लागणार्या एका स्थानिक नागरिकांनी सांगितले.
महानगर पालिकेने (Chandrapur Municipal Corporation) परिस्थिती हाताळण्यासाठी टँकर च्या संख्येत वाढ केली असली तरी, हे उपाय तात्पुरतेच असून दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जलसाठ्यांचे संवर्धन, गळती थांबवणे, आणि पाण्याच्या योग्य नियोजनाची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.