यवतमाळ (Yavatmal Mahavitaran) : महावितरणकडून वीज ग्राहकांना सुरळीत वीज उपलब्ध व्हावी अशी नागरिकांना अपेक्षा असते, परंतु गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा सातत्याने खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत. महावितरणकडून नियमितपणे मेंटेनन्सची कामे केली जातात तरीही वीज पुरवठा खंडित होत आहे.
परिणामी वीज ग्राहकांचा अपेक्षाभंग होत असून, याकडे (Yavatmal Mahavitaran) महावितरणच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे. सध्या तापमानाचा४३ अंशापार गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिक पंखे, कूलर, एसी आदींचा वापर करतात. पण विजेचा लपंडाव सुरू असल्याने या साधनांचा वापरही करता येत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरात वीजपुरवठा खंडित होणार नाही याकडे महावितरणने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.
मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता आणखीनच वाढली आहे. . त्यामुळे उष्णतेपासून बचावासाठी नागरिक पंखे, कूलर, एसी आदींचा वापर करत आहेत. यामुळे विजेचा १० टक्के भार वाढला आहे. परिणामी, (Yavatmal Mahavitaran) महावितरणची यंत्रणा कोलमडत आहे. शहरी भागात विजेची मागणी वाढल्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. संपूर्ण शहारातील बहुतांश वसाहतींमध्ये वीजपुरवठा सकाळ, दुपार, संध्याकाळ, खंडित होत असल्याने नागरिक हैराण आहेत. नागरिकांना अनेक तास अंधारातच राहून काढावे लागत आहे. त्यामध्ये उकाड्यासह डासांचा सामना करावा लागला.