Mumbai Heatwave :- देशातील बहुतांश राज्यांना थंडीने निरोप दिला आहे. त्याचवेळी, अनेक राज्यांमध्ये लोकांना दिवसा उकाडा जाणवू लागला आहे. इतकेच नाही तर हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशाराही जारी केला आहे. मुंबईत (Mumbai)मंगळवार आणि बुधवारी (25 आणि 26 फेब्रुवारी) कडक उन्हाची शक्यता हवामान खात्याने (Department of Meteorology) वर्तवली आहे.
हवामान खात्याने यलो अलर्ट केला जारी
भारतीय हवामान खात्याने दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट (Yellow Alert)जारी केला आहे. सोमवारी मुंबईचे कमाल तापमान 38.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे फेब्रुवारी महिन्यातील पाच वर्षांतील सर्वोच्च तापमान आहे. मुंबईत पुढील दोन दिवस उष्मा आणि आर्द्रता कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 37 अंश सेल्सिअस आणि 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
या जिल्ह्यांमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा
मंगळवार आणि बुधवारी मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगडमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र गुरुवारपर्यंत तापमानात घट होणार असल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस अनेक राज्यांमध्ये पावसाची (Rain)शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्ये २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत पावसाची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत रिमझिम पाऊस अपेक्षित आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळमध्येही पावसाची शक्यता आहे.