आ. देशमुखांच्या प्रतिमेस भाजपाचा दूषित पाण्याचा अभिषेक!
लातूर () : मागील कांही दिवसांपासून शहरात केला जात असलेला दूषित पाणी पुरवठ्यास आ. अमित देशमुख जबाबदार आहेत, त्यांच्या दुर्लक्षामुळे लातूरकरांवर दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ आली असल्याचा आरोप करत अजित पाटील कव्हेकरांच्या नेतृत्वात भाजपाने निषेध रॅली काढून (Latur municipal Elections) महापालिकेच्या आवारात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस दूषित पाण्याचा जलाभिषेक केला.
लातूर शहर महानगरपालिकेच्या (Latur municipal Elections) मागील कांही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून अशुद्ध, गढूळ पाण्यामुळे लातूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी लातूर शहरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या मात्र याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आ. अमित देशमुख यांनी याबाबत ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्याकडून काहीच केले जात नसल्याचा आरोप करीत भाजपाने हे आंदोलन केले. तसेच आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी ऍड. प्रदीप मोरे, रवी सुडे, प्रा. उदय देशपांडे, आबा चौगुले, निखिल गायकवाड, संजय गीर, विजय अवचारे, अतिश कांबळे, गणेश कसबे, राहुल भुतडा, सुरेश जाधव, अजय भूमकर, गोपाळ वांगे, अनिल पतंगे, सुरेश राठोड, संतोष तिवारी, पांडुरंग बोडके, लखन कावळे, सचिन पांचाळ, योगेश घोरपडे, अरुण ढवळे, गोविंद सूर्यवंशी, रोहित माने, सचिन जाधव आदी कार्यकर्ते सहभागी होते.
10 एप्रिललाच आंदोलन केले. काँग्रेस : ही तर भाजपाची ‘फेकाफेकी’
लातूर : आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेवर जलाभिषेक करून भाजपा शहरातील होणाऱ्या (Latur municipal Elections) दूषित पाणीपुरवठ्याबाबत फेकाफेकी अर्थात् फेक नॅरेटीव्ह पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करीत वास्तविकता यापेक्षा वेगळी आहे, असे सांगत लातूर होणाऱ्या दूषित पाणीपुरवठा बाबत काँग्रेसने 10 एप्रिल रोजी आंदोलन करीत प्रभारी आयुक्त जाधवांना निवेदन दिले होते, असा पलटवार काँग्रेसने केला आहे.
दूषित पाणीपुरवठा बाबत 16 एप्रिल रोजी आमदार अमित देशमुख यांनी (Latur municipal Elections) महानगरपालिकेत आढावा बैठक घेत आयुक्तांकडे दूषित पाणीपुरवठा संदर्भाने कडक शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करत लातूरकरांना शुद्ध पाणी देण्याबाबत सूचना केल्या. या संदर्भाने ही त्यांनी अनेक वाहिनांशी या बैठकीनंतर संवाद साधला, तोही लातूरकरांना ठाऊक आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे. हे सर्व असे असताना आणि स्वतःच शासनकर्ते असणाऱ्या भाजपाने लातूरकरांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी महापालिकेत एक आंदोलन केले आणि स्वतःचे पाप झाकण्याचा प्रयत्न केला, असा पलटवारही काँग्रेसने केला आहे.
पापाचे श्रेय घ्यायला पुढे का येत नाहीत?
लातूरमध्ये (Latur municipal Elections) काही योजना मंजूर झाली किंवा काही कामे मंजूर झाली की, त्याच्या श्रेयासाठी पुढे येणारे भाजपावाले पिवळ्या पाण्याच्या पापाचे श्रेय घ्यायला पुढे का येत नाहीत? असा सवाल काँग्रेसने केला आहे. तुमच्या भूलथापांना लातूरकर जशाला तसे उत्तर द्यायला तयार आहेत, इशाराही काँग्रेसचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी दिला आहे.