आरसीबीचे स्वप्न पुन्हा भंग होण्याची शक्यता…
नवी दिल्ली (IPL 2025 Preity Zinta) : आयपीएल 2025 मध्ये पहिल्यांदाच चॅम्पियन होण्याच्या मार्गावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला बीसीसीआयच्या नवीन नियमामुळे मोठी अडचण येऊ शकते. (IPL 2025) गेल्या 17 हंगामात जेतेपद जिंकण्यात अपयशी ठरलेल्या आरसीबीने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी (IPL champions) करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पण जर शेवटच्या दिवशी पावसामुळे सामना रद्द झाला तर (RCB) आरसीबीचे स्वप्न पुन्हा एकदा भंग होऊ शकते.
जर पाऊस पडला अन् मॅच रद्द झाली तर…
पंजाब किंग्जचा (Punjab Kings) संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) जिंकून अंतिम फेरीत पोहोचले आहे. अंतिम सामना आरसीबी आणि पंजाब यांच्यात होणार आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर आरसीबीला नुकसान सहन करावे लागेल. दुसरीकडे, टेबल टॉपर असल्याने, (Punjab Kings) पंजाब किंग्जचा संघ कोणताही सामना न खेळता ट्रॉफी जिंकू शकतो. बीसीसीआयने अद्याप अंतिम सामन्यासाठी (IPL 2025) राखीव दिवस जाहीर केलेला नाही. तथापि, राखीव दिवस असण्याची अपेक्षा आहे.
तर पंजाब किंग्ज IPL चॅम्पियन बनणार
बीसीसीआयने अद्याप आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर केलेला नाही. पण शक्यता अजूनही कायम आहे. जर दोन्ही दिवशी पावसामुळे सामन्याचा निकाल लागला नाही, तर दोन्ही संघांना आयसीसीप्रमाणे संयुक्त विजेते घोषित केले जाणार नाही. त्याऐवजी, (IPL 2025) पॉइंट टेबलमध्ये सर्वात वरती असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. या बाबतीत, पहिल्या स्थानावर असलेला पंजाब किंग्ज आयपीएल 2025 चा चॅम्पियन बनू शकतो.