देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: अमेठीतून माघार….!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > संपादकीय > अग्रलेख > अमेठीतून माघार….!
संपादकीयअग्रलेख

अमेठीतून माघार….!

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/10 at 11:52 AM
By Deshonnati Digital Published May 10, 2024
Share

मागच्या वेळी केरळच्या वायनाडमधून विजय मिळवित गांधी घराण्याची प्रतिष्ठा राखण्यात यशस्वी ठरलेल्या राहुल गांधींनी यावेळी मागचा अनुभव लक्षात घेता अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात वायनाडमधूनही ते रिंगणात आहेतच. वास्तविक अमेठी हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला समजला जातो. मागच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या मतदारसंघातून गांधी घराण्याचा उमेदवार सातत्याने निवडून येत होता; परंतु मागच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना भाजपच्या स्मृती इराणींकडून पराभव स्वीकारावा लागला होता. उत्तर भारतातील पक्षाचा प्रभाव टिकवायचा असेल, वाढवायचा असेल तर गांधी घराण्यातील कुणी तरी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढविणे अपरिहार्य ठरते. यापूर्वी थेट नेहरूंपासून गांधी घराण्यातील सदस्यांनी उत्तर प्रदेशमधून सातत्याने निवडणूक लढली आहे. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी आणि संजय गांधींना उत्तर प्रदेशातून पराभवाचा सामना करावा लागला होता; परंतु त्यांनी उत्तर प्रदेशला पर्याय शोधला नाही, पुन्हा त्याच उत्तर प्रदेशातून त्यांनी लोकसभा जिंकली होती. सोनिया गांधी एकदा चिकमगलूरमधून निवडणूक लढल्या होत्या; परंतु अमेठी आणि रायबरेली या पारंपरिक मतदारसंघातून गांधी घराण्याचा प्रतिनिधी कायमच लोकसभेत प्रवेश करीत आला आहे. मागच्या निवडणुकीत सोनिया गांधी रायबरेलीतून रिंगणात होत्या तर राहुल गांधी अमेठीतून उमेदवार होते; परंतु अमेठीतील वातावरण बदलत असल्याचे पाहून राहुल गांधींनी अमेठीसोबतच केरळच्या वायनाडमधूनही निवडणूक लढविली आणि त्यांची ती भीती खरी ठरली.

अमेठीतून स्मृती इराणींनी राहुल गांधींचा ५५ हजार मतांनी पराभव केला. या पृष्ठभूमीवर उत्तर प्रदेशसोबत जुळलेली पक्षाची नाळ तुटू नये म्हणून यावेळीही राहुल आणि प्रियंका गांधी निवडणूक रिंगणात उतरतील असे बोलले जात होते; परंतु प्रियंका गांधींनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, सोनिया गांधींनी या आधीच राज्यसभेत प्रवेश केलेला होता, त्यामुळे राहुल गांधी कोणत्या मतदारसंघाची निवड करतात याची उत्सुकता होती. भावनिकदृष्ट्या विचार केला असता तर त्यांनी पुन्हा अमेठीतून निवडणूक लढवून मागच्या पराभवाचा बदला घेण्यासोबतच गांधी घराण्याची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करणे अपेक्षित होते; परंतु अमेठीतील वातावरण तितके सुरक्षित नाही हे लक्षात आल्यावर हात दाखवून अवलक्षण करण्याऐवजी तुलनेत अधिक सुरक्षित असलेल्या रायबरेलीतून निवडणूक मैदानात उतरण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. वास्तविक ५५ हजारांचे मताधिक्य हे काही खूप जास्त नाही, राहुल गांधींनी जिद्दीने ही जागा लढविली असती तर त्यांना विजय मिळू शकला असता; परंतु गणित जुळून आले नसते आणि राहुल गांधींना पुन्हा तिथून पराभव पत्करावा लागला असता तर केवळ गांधी घराण्याच्याच नव्हे तर काँग्रेसच्याही प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला असता. तसेही उत्तर प्रदेशात काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस घटत चालली आहे, त्यात या पराभवाची भर पडली असती तर उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. त्यामुळेच भावनेच्या आधारे विचार न करता राहुल गांधींनी राजकीय विचार करीत रायबरेलीची निवड केल्याचे दिसते. खरे तर राहुल गांधी अमेठीतून पुन्हा लढणार नाहीत याचे संकेत आधीपासूनच मिळत होते.

मागच्या पराभवानंतर राहुल गांधी केवळ दोन वेळा अमेठीत आले. दुसरीकडे स्मृती इराणींनी मात्र तुमच्या खासदाराला भेटण्यासाठी दिल्लीत यावे लागणार नाही, असे आश्वासन देत अमेठीमध्येच स्वत:चे घर बांधले. शिवाय अमेठी लोकसभा मतदारसंघातील आकडेवारीदेखील काँग्रेससाठी फारशी उत्साहवर्धक नव्हती. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अमेठी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाचपैकी एकाही जागेवर विजय मिळविता आला नव्हता. त्या आधीच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची अमेठीतील पाटी कोरीच होती. काँग्रेसची उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आघाडी असली तरी ही आघाडी अमेठीत भाजपला तोंड देऊ शकेल, असा विश्वास काँग्रेस नेतृत्वाला वाटत नसल्याने राहुल गांधींसाठी अधिक सुरक्षित अशा रायबरेलीची निवड करण्यात आली. हा एक धोरणात्मक आणि योग्य निर्णय म्हणायला हरकत नाही. राहुल गांधींना रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागी यश मिळाले तर कदाचित रायबरेलीची राहुल गांधींकडे ठेवून वायनाडमधून प्रियंका गांधींना पोटनिवडणूक लढविण्याची संधी काँग्रेसकडून दिली जाऊ शकते. अशा प्रकारे काँग्रेसला उत्तर-दक्षिण समन्वयदेखील साधता येऊ शकतो.

You Might Also Like

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

Ganesh Chaturthi: गणपतीला ‘विघ्नराज’ का म्हणतात? ‘ही’ पौराणिक कथा जाणून घ्या!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsआरोग्यविदेश

bird flu: बर्ड फ्लूने जगातील पहिला मृत्यू!

Deshonnati Digital Deshonnati Digital June 6, 2024
Sangli : रत्नागिरी – नागपूर महामार्गा विरोधातील आंदोलनामुळे कोल्हापूर पोलिसांनी राजू शेट्टींना घेतले ताब्यात
Gadchiroli Naxalites: पोलीस नक्षल-चकमक; तब्बल 12 नक्षलवादी ठार, 2 जवान जखमी…बघा VIDEO
उदासीनता सोडून सरकारने शेतकर्‍यांना न्याय द्यावा!
Today Weather Updates: पुढील 2 दिवस यलो अलर्ट; अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Supreme Court CJ B. R. Gawai
Breaking Newsदेशप्रहारमहाराष्ट्रसंपादकीय

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

October 12, 2025
Jolly LLB 3 And Farmer
मनोरंजनप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

September 28, 2025
Farmer Loan Waiver
Breaking Newsप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

September 22, 2025
Prakash Pohare
विदर्भअकोलामहाराष्ट्रलेखशेतीसंपादकीय

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

September 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?