जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे प्रतिपादन
गडचिरोली (Agricultural Sector Productivity) : जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे आणि प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि कडधान्य अभियान या महत्त्वाकांक्षी योजनांचा राष्ट्रीय स्तरावर आज शुभारंभ झाला. याच अनुषंगाने, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी (Agricultural Sector Productivity) कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित शेतकर्यांना या योजनेविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर , मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राहुल मोरघडे, कृषी व संलग्न विभागातील अधिकारी, कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी पंडा यांनी योजनेच्या पाच प्रमुख उद्दिष्टांवर भर दिला. यात विशेषत: गडचिरोली जिल्ह्यात, पीक उत्पादकता वाढवण्याला मोठा वाव आहे. केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता, शेतकर्यांनी कोणकोणती पिके घ्यावीत, यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
मुलचेरा येथील शेतकरी लवकर काढणी करून रब्बीसाठी भाजीपाला प्रक्रिया करू शकतात, असे उदाहरण त्यांनी दिले. (Agricultural Sector Productivity) जिल्ह्याची साठवण क्षमता आणि पायाभूत सुविधा वाढवणे. सिंचन, लघु पाटबंधारे, मृद व जलसंधारण आणि मामा तलाव यांसारख्या विविध स्रोतांद्वारे सिंचन सुविधा वाढवण्यावर योग्य उपाययोजना करणे. आर्थिक लाभ आणि सबसिडी: केंद्र आणि राज्य सरकारच्या ११ विभागांच्या ३६ हून अधिक योजना एकत्र आणल्यामुळे, शेतकर्यांना मिळणारे आर्थिक लाभ आणि सबसिडी (अनुदान) याबद्दल क्षेत्रीय स्तरावरील कर्मचार्यांनी मार्गदर्शन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
ट्रॅक्टर आणि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकर्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. क्लस्टर पद्धतीने काम करून कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी सर्वांनी लक्ष घालावे आणि निश्चितच यश मिळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पंडा यांनी केले.
नैसर्गिक शेती आणि कडधान्यांवर लक्ष केंद्रित
यासोबतच, कडधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जेणेकरून आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान प्रभावीपणे राबवून पर्यावरणाचा समतोल राखणे आणि शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे यावरही भर देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.