हिंगोली (Hingoli Zilla Parishad) : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक शौचालय घनकचरा व्यवस्थापन , सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंब स्तर ) या माध्यमातून स्वच्छ माझे अंगण अभियानाला रविवार १ सप्टेंबर पासुन जिल्ह्यात सुरूवात होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी या उपक्रमाची प्रभावी पने अंमलबजावणी करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या (Hingoli Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुमार कुंभार यांच्या मार्गदरशनाखाली पाणी व स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुळकर्णी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ माझे अंगण अभियानाला रविवार पासून जिल्ह्यात प्रारंभ केला जाणार आहे.
दरम्यान, सर्व कुटुंब स्तरावर या बाबीची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन नित्य नियमाने स्वच्छतेचा बाबीची सवयी अंगीकृत करण्यासाठी जे कुटुंब वैयक्तिक शौचालय सांडपाणी व्यवस्थापना करता घनकचरा व्यवस्थापनिकरता कंपोस्ट खतखडा आणि घरगुती खतखडा आणि कुटुंब स्तरावर कचराकुंड्या याबाबतची उपलब्ध करून घेतल्या असून त्याचा नियमितपणे वापर करतात, अशा कुटुंबांना आपला प्रोत्साहन देणे आणि त्याचे अनुकरण करण्याकरता इतर ग्रामस्थांना कुटुंबा करता त्यांच्याप्रमाणे तो वैयक्तिक स्वरूपाच्या स्वच्छतेचा सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्याकरता उद्युक्त करणे ही या अभियानाची संकल्पना आहे.
कुटुंब स्तरावरील प्रत्येक घटकाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी गावातील सर्व कुटुंबामध्ये “स्वच्छ माझे अंगण” अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना दोन ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री संजय कुलकर्णी यांनी दिली आहे .
जिल्ह्यातील (Hingoli Zilla Parishad) सर्व कुटुंब स्तरावर वैयक्तिक शौचालय सांडपाणी व्यवस्थापन शोषखड्डा, परसबाग , पाझरखडा, घनकचरा व्यवस्थापना करता कंपोस्ट खत खड्डा अथवा घरगुती खत खड्डा आणि कुटुंब स्तरावर कचराकुंडी या बाबीची प्रभावीपणे आपण अमोलबजावणी होऊन स्वच्छतेची सवय यांनी अंगीकरत करण्यासाठी लोक चळवळ उभी करण्यात या उद्देशाने जिल्ह्यामध्ये “स्वच्छ माझे अंगण “अभिमानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.
निवडीचे निकष
घरगुती परसबाग वैयक्तिक शौचालय घरगुती कचराकुंड्याचा वापर, अभियान अंमलबजावणी कालावधी १ ते २५ सप्टेंबर अखेर केली जाणार आहे.