देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: निवडणूक कर्मचारी आणि मतदान केंद्र!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > संपादकीय > लेख > निवडणूक कर्मचारी आणि मतदान केंद्र!
संपादकीयलेख

निवडणूक कर्मचारी आणि मतदान केंद्र!

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/10 at 12:15 PM
By Deshonnati Digital Published May 10, 2024
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत असलेल्या शाळांच्या इमारती, तसेच सरकारी व निमसरकारी महाविद्यालयांच्या इमारती मतदान केंद्र असतात. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कर्मचार्‍यांना दोन दिवस मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान प्रक्रिया राबवावी लागते. त्यांचे या मतदान केंद्रावरील अनुभव अंगावर शहारे उभे करतात.

१८ व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी स्वतंत्र असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग तर नाहीच शिवाय इतर व्यवस्थाही नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत असलेल्या शाळांच्या इमारती, तसेच सरकारी व निमसरकारी महाविद्यालयांच्या इमारती मतदान केंद्र असतात. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कर्मचार्‍यांना दोन दिवस मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान प्रक्रिया राबवावी लागते. त्यांचे या मतदान केंद्रांवरील अनुभव अंगावर शहारे उभे करतात. १९७६ मध्ये केलेल्या ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार पाच विषय राज्यसूचीतून समवर्ती सूचीत हस्तांतरित करण्यात आले. त्यापैकी शिक्षण हा एक विषय आहे. समवर्ती सूचीतील विषयासंदर्भात कायदा करून अंमलबजावणी करण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकार या दोघांनाही आहे. म्हणजेच शैक्षणिक व्यवस्थेवर दोन्ही सरकारचे नियंत्रण आहे. भारतीय संविधानाने शैक्षणिक मूलभूत अधिकारही दिला, तसेच मार्गदर्शक तत्त्वातील तरतुदींनुसार शैक्षणिक व्यवस्थेचे जाळे निर्माण करण्यात आले. या शाळांमधील सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहे. महाराष्ट्र सरकार शालेय शिक्षणावर ५० हजार कोटींच्यावर खर्च अर्थसंकल्पात दाखविते.

कार्यालये, वर्गखोल्या, किचन, शौचालय, वीज, पंखे, लाईटस्, विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि कंपाऊंड इत्यादी पायाभूत घटक आहेत; मात्र या घटकांची अवस्था फारशी समाधानकारक नाही. संडास आहे पण दरवाजा नाही, दरवाजा आहे; पण त्याला कडी नाही, कनेक्शन आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर कनेक्शन नाही. रात्रभर सेवेसाठी मच्छर असतातच. अशाप्रकारे जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिकांतर्गत असलेल्या बहुसंख्य शाळांची स्थिती दयनीय आहे. तेथे आवश्यक सुविधांचा अभाव आहे. जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या कमी होत आहे त्याचे प्रमुख कारण शाळांची दुरवस्था आहे. एकीकडे शालेय पोषण आहार योजना, तर दुसरीकडे शाळांची ही स्थिती चिंतनीय नव्हे का? अध्ययन आणि अध्यापन करणार्‍या या पवित्र ठिकाणी सुविधांअभावी अस्वच्छतेचा वास असतो. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होतो. अशा व्यवस्थेशी जे शिक्षक आणि विद्यार्थी रोज संघर्ष करतात त्यापेक्षा अधिक निवडणूक कर्मचार्‍यांना दोन दिवस करावा लागतो. निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रावर गेल्यावर काही ठिकाणी पाण्याची, तर काही ठिकाणी लाईटची अडचण, तर काही ठिकाणी सतरंजीसुद्धा नसते. कुलर तर सोडाच कसेबसे पंखे सुरू असतात. शाळांमध्ये स्नानगृहाची व्यवस्था नसल्याने असेल त्या कोपर्‍यात कर्मचारी आंघोळी करतात. म्हणजेच शाळांमध्ये प्राथमिक सुविधासुद्धा योग्य पद्धतीच्या उपलब्ध नसतात.

ग्रामीण भागातील शाळांची व्यवस्था, तर फारच वाईट आहे. ३८ ते ४२ अंश सेल्सियस तापमानाने तापणार्‍या टिनाखाली बसून मतदान प्रक्रिया राबविली जाते. या निवडणुकीत महिला कर्मचार्‍यांची संख्या अधिक आहे. काही मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिलांवर सोपविली गेली. त्यांनाही सुविधांअभावी त्रास सहन करावा लागतो. आदिवासी भागातील मतदान केंद्रांची स्थिती तर अधिकच नाजूक आहे. निवडणुकांची कामे अत्यावश्यक सेवेत टाकल्याने ती करणे बंधनकारक आहेत, तर मग कर्मचार्‍यांना मतदान केंद्रांवर सुविधा पुरविणेही बंधनकारक असावे. शाळा आपल्याच भागातील असल्याने त्या परिसरासोबत पालकांचा आणि स्थानिक नेत्यांचा रोजचा संबंध येतो. आमदार, खासदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी त्या-त्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यांना त्या शाळांच्या अवस्था दिसल्या; पण त्याकडे दुर्लक्ष करावे लागले. तेच लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारादरम्यान विकासाचा दावा करतात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक योगदानाचा दाखला देतात. लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांच्या कमिशन पद्धतीमुळे सुविधांचा दर्जाही खालावला. सरकारच्या बजेटमध्ये खर्च दिसतो तर तो जातो कोठे? अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या समन्वयातून शैक्षणिक व्यवस्था सुधारणे अपेक्षित असते. केंद्र, राज्य व स्थानिक सरकारच्या नियंत्रणात असलेल्या शाळांमधील आवश्यक सुविधा सुस्थितीत नसल्याने त्याचा फटका सर्वच विभागांतील निवडणूक कर्मचार्‍यांना बसतो. असो लोकशाहीचा आत्मा असलेली निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबविणार्‍या संबंधित सर्वच कर्मचार्‍यांना सलाम!

प्रा. डॉ. विनोद गायकवाड
९८५०३२४२०२
राजकीय अभ्यासक

You Might Also Like

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

Ganesh Chaturthi: गणपतीला ‘विघ्नराज’ का म्हणतात? ‘ही’ पौराणिक कथा जाणून घ्या!

TAGGED: कर्मचारी, निवडणूक, लोकसभा, शाळां
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Lightning Death
विदर्भनागपूर

Lightning Death: शेतात विज पडुन शेतमजुर युवतीचा मुत्यु

Deshonnati Digital Deshonnati Digital September 14, 2025
New Delhi: शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक: उपराष्ट्रपती जगदीप धनखड
Water supply Yojana: कोट्यवधी रुपयांची पाणीपुरवठा योजना पण तुमसरवासियांच्या नशिबी गढूळ पाणी
Buldhana: घरेलू माश्याने शेतकरी त्रस्त; घर असुन रहाणे झाले कठीण
Gharkul Yojana: घरकुल तक्रारी घेऊन रतनवाडीच्या महिलांची प. स. वर धडक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Supreme Court CJ B. R. Gawai
Breaking Newsदेशप्रहारमहाराष्ट्रसंपादकीय

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

October 12, 2025
Jolly LLB 3 And Farmer
मनोरंजनप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

September 28, 2025
Farmer Loan Waiver
Breaking Newsप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

September 22, 2025
Prakash Pohare
विदर्भअकोलामहाराष्ट्रलेखशेतीसंपादकीय

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

September 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?