देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: विचारधारा महत्त्वाची, पण….!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > संपादकीय > अग्रलेख > विचारधारा महत्त्वाची, पण….!
संपादकीयअग्रलेख

विचारधारा महत्त्वाची, पण….!

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/14 at 6:52 PM
By Deshonnati Digital Published May 14, 2024
Share

विचारधारा एक असेल तर एकत्र काम करणे किंवा एकत्र येणे फारसे कठीण नाही, अशा आशयाचे विधान शरद पवारांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात बर्‍याच प्रतिक्रिया उमटल्या. अगदी पंतप्रधान मोदींनीही वेगळा विचार करायचाच असेल तर देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी शरद पवार तसेच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सहकार्‍यांप्रमाणेच भाजपसोबत यावे असे आवाहन केले. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही शरद पवारांच्या विधानाचे स्वागत केले. पृथ्वीराज चव्हाण सारख्या काही नेत्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिल्या. या सगळ्याच्या दृष्टीने ही लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. निवणुकीचे निकाल काहीही आले तरी निवडणुकीनंतर राजकीय क्षेत्रात मोठी घुसळण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असेल तर आज काँग्रेसपासून दूर असलेले काही प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत सहकार्य करण्यास तयार होतील, कदाचित काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीनही होतील, परंतु काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन करण्याइतपत जागा जिंकू शकली नाही तर हेच आज काठावर असलेले पक्ष भाजपच्या वळचणीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यामागे शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे विचारधारा महत्त्वाची आहे असे म्हणणे तितकेसे योग्य ठरत नाही.

विचारधारा हा आधार इतकाच बळकट असता तर काँग्रेसची इतकी शकले झाली नसती. स्वत: शरद पवारांचा पक्ष गेल्या पंचविस वर्षांपासून काँग्रेससोबत आघाडीत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे, असे असूनही शरद पवारांनी आपले वेगळे अस्तित्व कायम ठेवले, कारण विचारधारा हा सैद्धांतिकदृष्ट्या मांडण्यासाठी एक चांगला मुद्दा असला तरी राजकारणात सत्ता किंवा सत्तेतील वाटा हा घटक अधिक प्रभावी ठरतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची विचारधारा आणि भाजपची विचारधारा तशी एकच आहे, परंतु उद्धव ठाकरेंनी भाजपपासून फारकत घेतली ती त्यांची किंवा भाजपची विचारधारा बदलली म्हणून नाही तर हा निव्वळ सत्तेतील हिस्सेवाटीचा वाद होता. प.बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी गेल्या दशकभरात डाव्या पक्षांसह काँग्रेसचेही अस्तित्व संपुष्टात आणले. ममता बॅनर्जी काँग्रेसमध्येच होत्या आणि आजही त्यांची वेगळी अशी कोणतीच विचारधारा नाही, मूळ काँग्रेसच्या विचारधारेवरच त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे, परंतु त्यांनीही काँग्रेसपासून फारकत घेतलीच, अगदी या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेससोबत राजकीय तडजोड करण्यास नकार दिला. आज भाजपसोबत असलेले अनेक राजकीय पक्ष हे काही भाजपची राजकीय विचारधारा मान्य आहे म्हणून त्यांच्यासोबत नाहीत तर ती केवळ सत्ताकारणातील त्यांची एक गरज आहे म्हणून.

विचारधारा एक असेल तर एकत्र येणे किंवा एकत्र काम करणे सोईचे जाते, अशा परिस्थितीत काही वेगळा निर्णय घेतल्यास आपल्या समर्थक मतदारांना समजावणे सोपे जाते. उद्या शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलिन होण्याचा निर्णय घेतलाच तर त्यांच्या पक्षाच्या समर्थक मतदारांना फार मोठा धक्का वगैरे बसणार नाही, उलट विचारधारा एक असतानाही एकमेकांच्या विरोधात लढताना बरीच तार्किक कसरत करावी लागते. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले कारण भाजप विरोधी विचारधारेचे मतदान अनेक पक्षांमध्ये विभागले गेले. ही विभागणी टाळण्यासाठीच यावेळी भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येत एक आघाडी स्थापन केली. खरे तर विचारधारा एकच असेल तर या सगळ्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन होणे अपेक्षित होते, परंतु तसे होणार नाही. कदाचित काही पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतीलही, परंतु त्यामागे केवळ विचारधारा हे एकच कारण नसेल राजकीय तडजोडीचा भाग त्यात मोठा असेल. सांगायचे तात्पर्य विचारधारा एक असणे या एका निकषावर राजकीय विचार होत नाहीत.

काँग्रेसमधून आजवर अनेक नेते बाहेर पडले, त्यापैकी काहींनी आपले स्वतंत्र पक्ष स्थापन करून काँग्रेससमोरच आव्हान उभे केले, त्यामागे एक मोठे कारण सत्तेत किंवा पक्षात योग्य मानसन्मान राखल्या गेला नाही हेदेखील होते. आसामचे विद्यमान मुख्यमंत्री एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते होते, परंतु शीर्षस्थ नेत्याने केलेल्या अपमानाने ते दुखावले आणि आज ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. अशाच छोट्या-मोठ्या कारणांमुळे विचारधारा एक असूनही अनेकांनी काँग्रेस सोडली. आता कदाचित सत्तेच्या आकर्षणातून ते पुन्हा काँग्रेसकडे परतू शकतील. थोडक्यात सांगायचे तर भारतीय राजकारणात विचारधारेपेक्षा संधी आणि सोय हे दोनच घटक महत्त्वाचे आहेत, कधी कधी ते विचारधारेच्या वेष्टणात झाकण्याचा प्रयत्न होतो एवढेच.

You Might Also Like

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

Ganesh Chaturthi: गणपतीला ‘विघ्नराज’ का म्हणतात? ‘ही’ पौराणिक कथा जाणून घ्या!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Parbhani Theft
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Theft: परभणीत भरदिवसा चोरी; दोन लाखाचे सोन्याचे गंठण लंपास

Deshonnati Digital Deshonnati Digital August 13, 2025
2025 Upcoming Movies: 2025 मध्ये चित्रपटांचा धमाका…जाणून घ्या कोणता चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
Asia cup 2025 Ind vs Pak : “भारताचा पाकिस्तानवर ६ विकेट्सने दणदणीत विजय”
MLA Abhimanyu Pawar: आ. पवारांच्या ‘एन्ट्री’ने लातूरची काँग्रेस कासावीस!
MLA Dharmarao Baba Atram: जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करण्यासाठी पक्षसंघटन मजबूत करा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Supreme Court CJ B. R. Gawai
Breaking Newsदेशप्रहारमहाराष्ट्रसंपादकीय

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

October 12, 2025
Jolly LLB 3 And Farmer
मनोरंजनप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

September 28, 2025
Farmer Loan Waiver
Breaking Newsप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

September 22, 2025
Prakash Pohare
विदर्भअकोलामहाराष्ट्रलेखशेतीसंपादकीय

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

September 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?