देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmer Heavy Damage : ‘तेल गेलं, तुपही गेलं अन् हातात धुपाटणं आलं’
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Farmer Heavy Damage : ‘तेल गेलं, तुपही गेलं अन् हातात धुपाटणं आलं’
विदर्भभंडाराशेती

Farmer Heavy Damage : ‘तेल गेलं, तुपही गेलं अन् हातात धुपाटणं आलं’

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/09 at 3:01 PM
By Deshonnati Digital Published October 9, 2025
Share
Farmer Heavy Damage

शेतकर्‍याचं नशिबच फाटकं, सर्व निसर्गानं हिरावून नेलं

भंडारा (Farmer Heavy Damage ) : निसर्गाचे संकट झेलताना शेतकर्‍यांच्या नाकी नऊ येत आहे. ‘इकडे आड, तिकडे विहिर’ अशी दयनिय अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. निसर्गाचा पाऊसही पिच्छा सोडायला तयार नाही. हातातोंडाशी आलेला घास शेतकर्‍याच्या तोंडातून हिरावला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. (Farmer Heavy Damage)  संततधार अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यातही पाऊस कोसळत असल्याने धानासह सोयाबीन, कपाशी, मिरची, भाजीपाला व इतर पिकाचीही मोठी नासाडी झाली आहे. फळवर्गीय शेतीचीही तिच अवदशा होत आहे. यावर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आला असून ‘तेल गेलं, तुपही गेलं अन् हातात धुपाटणं आलं’ असून शेतकर्‍याचं नशिबच फाटकं, सर्व निसर्गानं हिरावून नेलं आहे ही म्हण शेतकर्‍यांसाठी तंतोतंत खरी ठरत आहे.

यावर्षी सप्टेंबर महिन्यापाठोपाठ ऑक्टोबरमध्येही अतिवृष्टीचा कहर सुरू आहे. चार दिवस पाऊस थांबला व पुन्हा कोसळला. (Farmer Heavy Damage)  अतिवृष्टी व परतीच्या पावसाने धानपिक, तूर, सोयाबीन, कपासी व भाजीपाला पिकाचेही नुकसान केले आहे. कापणीला आलेला धान भूईसपाट झालेला आहे. अजूनही शेतातील सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे काही शेतकर्‍यांच्या भूईसपाट झालेल्या धानाला कोंबे फुटली आहेत. तर काही शेतकर्‍यांनी भिजलेले व कापणी केलेले धानपिक बांध्याच्या धुर्‍यावर वाळविण्यासाठी ठेवले आहेत.

शेतीचा लागवड खर्च अवाढव्य झाला आहे. पण आता पिके घरी येतील की नाही याची शाश्वती राहिली नाही व पीक आलेही तरीपण ओल्या असलेल्या धानाला व्यापारी भाव देणार नाही. (Farmer Heavy Damage)  शेतकर्‍याच्या परिस्थितीकडे कुणाचे लक्ष नाही. निसर्गाचा कोप सुरूच आहे. त्यामुळे शासनही ‘रोज मरे, त्यासाठी कोण रडे’ अशी भूमिका घेत आहे. निसर्गासोबत शासनही शेतकर्‍याच्या पाठीशी येत असल्याचे दिसून येत नाही. अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करताना शेतकर्‍यांच्या नाकी नऊ येत आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकर्‍याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

पीक लागवडीचा खर्च निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. पीक निघाल्यावर कर्जाच्या व्याजाचे पैसे देणेही शेतकर्‍यांना अवघड जात आहे. काही शेतकर्‍यांनी कर्जापोटी शेती विकल्या आहेत. (Farmer Heavy Damage)  शेतकर्‍यांना वारंवार नापिकीचा सामना करावा लागत आहे. कधी पिकावर रोगराई येणार याची शाश्वती राहिली नाही. औषधी व फवारणीच्या खर्चात वाढ झाली आहे. रासायनिक खताचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतमजूर मिळत नसल्याने शेतमजुराची मनधरणी करावी लागत आहे. अधिकची मजुरी देऊनही शेतकर्‍याच्या शेतात मजूर काम करायला तयार नाहीत.

वन्यप्राण्यांचा हल्ला शेतकर्‍यांच्या जिवावर उठला आहे. तर सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना ग्रामीण भागात होत असून त्यात शेतकरी, शेतमजूर व गुराखी जिवानिशी जात आहेत. आर्थिक परिस्थितीने घायाळ असलेल्या (Farmer Heavy Damage)  शेतकरी मुलांना उच्च शिक्षण घेता येत नाही. आता हातातोंडाशी येणारे खरीप पीक निसर्गाचा पाऊस हिरावून नेणार त्यामुळे शेतकर्‍यांनी कर्ज फेडावे की स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत. मायबाप शासन प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशी मनधरणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

You Might Also Like

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे नविन मंदीरात श्री साईबाबा मुर्तीची स्थापना

CM Gram Sadak Yojana: ‘ना नफा-ना तोटा’ रेती धोरणाला हरताळ

Minister Dr. Pankaj Bhoyar: धान खरेदी बाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेणार: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Tiger Hunting: वाघाने केली म्हशीची शिकार; तातडीच्या भरपाईची मागणी

Lakhandur Paddy Harvesting: लाखांदूर तालुक्यात हलक्या वानाच्या धानपीक कापणीला वेग

TAGGED: Farmer Heavy Damage
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
IPL 2025 PBKS vs KKR
Breaking Newsक्रीडादेशमहाराष्ट्र

IPL 2025 PBKS vs KKR: पंजाबने IPLच्या 18 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम रचला…

Deshonnati Digital Deshonnati Digital April 16, 2025
Hingoli Heavy Rain: जिल्ह्यात अतिवृष्टी; 54 जणांना पुराच्या पाण्यातून वाचविले
Parbhani: वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चालकासह मालकावर गुन्हा दाखल
Government Medical College: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संत सेवालाल महाराज यांचे नाव द्यावे
Sanjay Dashpute: तिर्थक्षेत्र विकास कामाची सचिव दशपुते यांनी केली पाहणी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Saibaba Temple
अध्यात्मनागपूरविदर्भ

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे नविन मंदीरात श्री साईबाबा मुर्तीची स्थापना

October 13, 2025
CM Gram Sadak Yojana
विदर्भभंडारा

CM Gram Sadak Yojana: ‘ना नफा-ना तोटा’ रेती धोरणाला हरताळ

October 13, 2025
Minister Dr. Pankaj Bhoyar
विदर्भभंडाराराजकारणशेती

Minister Dr. Pankaj Bhoyar: धान खरेदी बाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेणार: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

October 13, 2025
Tiger Hunting
विदर्भभंडारा

Tiger Hunting: वाघाने केली म्हशीची शिकार; तातडीच्या भरपाईची मागणी

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?