Warora :- चंद्रपूर-नागपूर महामार्गावर (Chandrapur-Nagpur Highway) आज दि.१९ सप्टेंबर ला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आनंदवन चौक येथे चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला, काही क्षणात वाहन जाळून राख झाले. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.
वरोरा येथील आनंदवन चौकात
नागपूर निवासी अमीन हारून अली हाजी हे दोन सहकार्यांसह चंद्रपूर वरून नागपूरला अलक्झर वाहन क्रमांक एम.एच.३१ एफ.यु. ६६७३ ने निघाले होते, वरोरा मधील आनंदवन चौकात पोहोचल्यावर अचानक वाहनातून धूर निघू लागला, वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवीत तात्काळ वाहनातून सर्वाना खाली उतरवीत जवळच्या पेट्रोल पंपावरून अग्नि विरोधक यंत्र (Fire extinguisher) आणण्यास गेले. मात्र वाहनाने तोपर्यंत पेट घेतला होता. परत येईपर्यंत वाहन जाळून खाक झाले, मात्र वाहनातील नागरिक वेळेपूर्वी उतरल्याने मोठी घटना टळली. वाहन मालक अमीन हारून अली हाजी यांनी याबाबत माहिती दिली कि आम्ही सकाळच्या सुमारास चंद्रपूरवरून नागपूरसाठी निघालो असता वरोरा जवळ पोहोचल्यावर अचानक वाहनातून धूर निघायला लागला. वेळेपूर्वी आम्ही वाहनातून उतरलो अन्यथा मोठी घटना घडली असती. पुढील तपास सुरू आहे.