पातुर (Babhulgaon Revenue Board) : गेल्या काही दिवसांपासून सतत चालू असलेला पाऊस व दिनांक 26 व 27 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पातुर तालुक्यातील विशेषतः बाभूळगाव महसूल मंडळातील (Babhulgaon Revenue Board) गावांमधील सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
या नुकसानीची तातडीने दखल घेऊन पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्यात यावी या मागणीसाठी बाभुळगाव महसूल मंडळातील (Babhulgaon Revenue Board) शेतकरी मोठ्या संख्येने तहसील कार्यालय पातुर येथे जमले. यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदार पातुर तथा कृषी अधिकारी पातुर यांना निवेदन देऊन आपली मागणी सादर केली.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पाहता शासनाने तत्काळ उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी राजेश गावंडे शेख मुख्तार, सुरेश महानकार, राजू गवई, बब्बू भाई, शंकर बराटे, गणेश महल्ले, बंडू इंगळे, राजू उगले, विनोद कडाळे ,गजानन भोपळे, शिवहरी तांबडे, गणेश काष्टे गोपाल बदरखे, गोपाल अतकर प्रदीप बर्डे , संदीप इंगळे शिवचरण गोळे संतोष वानखडे, जयराम लासुरकर यावेळी शेंकडो शेतकरी उपस्थित होते.