शेतकर्यांची थट्टा, मानस अग्रो साखर कारखाना देव्हाडा बु. येथील प्रकार
पालोरा (Sugarcane Farmers) : मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बु. येथे मानस अग्रो साखर कारखाना असून मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी ऊस पिकाची लागवड केली त्यानुसार वर्ष २०२४-२५ हंगामातील ऊसाचे गाळप झाले असून अजूनही शेतकर्यांना पाच महिने होऊनही ऊसाचे चुकारे मिळाले नाही. डिसेंबर महिन्यातील ऊसाचे चुकारे देण्यात आले. मात्र जानेवारी महिन्यापासुन ऊसाचे चुकारे न केल्याने (Sugarcane Farmers) शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऊस पिकाची लागवड करणार्या शेतकर्यांना ऊसाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतीवर उचलेला कर्ज वेळेवर भरले गेले नसल्याने त्यांच्या वर व्याजासह रक्कम भरण्याची नामुष्की ओढवली आहे.
ऊस पिक हा वर्षे भराचा आहे त्यामुळे ऊसाची लागवड करणार्या (Sugarcane Farmers) शेतकर्यांना ऊसाचे चुकारे मिळाल्यानंतरच बॅकांचे कर्ज परतफेड करावे लागते. मात्र कारखाना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वेळेवर चुकारे होत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे कारखाना प्रशासन शेतकर्यांना ऊसाचे चुकारे देईल का की पुन्हा वर्षेभर कारखान्याचे चकरा माराव्या लागतील हे वेळच ठरवणार आहे. वेळेवर ऊसाचे चुकारे मिळत नसल्याने अनेक शेतकर्यांनी ऊसाची लागवड कमी केली असून नगदी मका पिकाची लागवड केली आहे.
चार महिन्यात मका पिकाची फसल निघते आणि पैसे सुध्दा वेळेवर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. मानस अग्रो साखर कारखाना येथील प्रशासक हे फक्त नावापुरते असून नागपूर वरून सुत्र चालतात. त्यामुळे नागपूर वरून सुचना मिळत नाही तो पर्यंत (Sugarcane Farmers) शेतकर्यांना ऊसाचे चुकारे मिळणार नसल्याने शेतकरी यांच्या विषयी खरोखरच जिव्हाळा असेल तर आठ दिवसांत शेतकर्यांना ऊसाचे चुकारे मिळणार, अन्यथा शेतकर्यांना ऊसाचे चुकारे मिळण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येईल का? अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
जानेवारी महिन्यात ऊस कारखान्याला नेण्यात आला. मात्र पाच महिने होऊनही (Sugarcane Farmers) ऊसाचे चुकारे मिळाले नसल्याने माझ्यावर आर्थिक संकट निर्माण झाला आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाने ऊसाचे चुकारे लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा कारखान्यासमोर आंदोलन करण्यात येईल.
ओमेश्वर मुंगमोळे, शेतकरी