Yawatmal :- राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर हे यवतमाळ येथे आले असता,त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये (Press conference) २०१४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकारने (BJP Govt)शेतकर्यांसाठी काहीच केले नाही, त्यामुळे शेतकरी कर्जाच्या चक्रव्युहामध्ये अडकला असून शेतकर्यांची कर्जमाफी करावी, विदर्भातील शेतकर्यांना ऊसा प्रमाणे एफआरपी दयावी, व शेतकर्यांच्या इतर मागण्यांकरीता २८ सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
२८ सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याची माहिती
यावेळी बोलताना ते म्हणाले की विदर्भातील शेतकर्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेवून शेतीसोबत (farmer) पुरक व्यवसाय करण्याचा भर दिला पाहिजे. शेतकर्यांच्या मुलांची शेतीचे अद्यावत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, त्याशिवाय फायद्याची शेती केली जावू शकणार नाही. मी मंत्री असताना दुधाला सर्वाधिक दर मिळवून दिले होते, हे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सत्ताधार्याकडून आपल्याला जाती जातीमध्ये भांडविले जात आहे.ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना सरकारने दयावे,कुणाच्याही आरक्षणाच्या हक्काला आमचा विरोध नाही. ज्या जातीची जेवढी जन संख्या असेल, तेवढया प्रमाणात त्यांना त्यांचा हक्क मिळायला पाहिजे. त्यासाठी कायदे तयार करण्याचे अधिकार संसदेला आहेत,त्यांनी ते करावेत असे स्पष्ट मत महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.