देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: आनंदी समाजासाठी एवढे करूया…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > संपादकीय > लेख > आनंदी समाजासाठी एवढे करूया…
संपादकीयलेख

आनंदी समाजासाठी एवढे करूया…

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/10 at 11:57 AM
By Deshonnati Digital Published May 10, 2024
Share

मोबाईलमध्ये आपण तासन्तास गुंतून बसतो परंतु आपल्या बाजूला असलेल्या आपल्या आईची-वडिलांशी, पत्नीशी, भावाशी आपल्या मुलांशी बोलण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. रेल्वेतून प्रवास करताना अथवा बसमधून प्रवास करताना जर आपण प्रवाशाकडे पाहिलात तर ते आपल्या बाजूला बसलेल्या प्रवाशांच्या सुख-दुःखाशी त्यांना आता देणे घेणे नाही तर ते आपल्या मोबाईलमध्ये काही तरी बघण्यात आणि शोधण्यात व्यस्त दिसत असतात; परंतु आता गावाकडच्या एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी हद्दपार होतानाही दिसून येत आहात. खरे तर ही परिस्थिती योग्य वेळीच सावरली नाही तर सामाजिक परिणाम अत्यंत गंभीर असतील हेही तितकेच खरे.

आधुनिक तंत्रज्ञानाने अचाट अशी प्रगती केली आहे. याच प्रगतीमुळे माणूस समाज आणि कुटुंबापासून दुरावत चालल्याचे विदारक चित्र अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून येते. भौतिक सुखाच्या मागे धावता-धावता माणूस एकाकी जीवनाकडे कधी वळला हे कळलेसुद्धा नाही, अशी परिस्थिती आपण पाहतो. संगणक आणि मोबाईल या वस्तू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. आपण मोबाईलच्या इतक्या अधीन गेलो आहोत की आपणही एक यंत्र झालोत की काय अशी भीती वाटावी इतकी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. एकाच कुटुंबात राहणार्‍या अनेक सदस्यांचा दिवस-दिवस संवाद होत नाही. आपण एकमेकांशी बोलण्यापेक्षा आपापल्या मोबाईलमध्ये जास्त व्यस्त राहण्याचा प्रयत्न करतो. केवळ मोबाईलमुळेच आपण एकाकी जीवन जगतो आहोत असे नाही; परंतु एकाकी जीवन जगण्यासाठी मोबाईलही तितकाच कारणीभूत आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मोबाईलमुळे जग जवळ आले; परंतु जवळची माणसं जगावेगळी झाली ही परिस्थिती मात्र विदारक आहे. अलीकडच्या काळात माणूस स्वतःला अलिप्त ठेवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना आपण पाहतो. आपल्याच कुटुंबातील आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा, काका- काकू, मामा-मामी, वहिनी-ताई कुटुंबातील या कोणत्याही सदस्यांशी आपल्याला बोलण्यासाठी आता वेळ मिळत नसल्याचे दिसून येते. एखादा अपवाद सोडले तर बहुतांश मंडळी एकाकी जीवन जगत आहेत. ही परिस्थिती का निर्माण झाली? याला कारणीभूत कोण आहेत? हे शोधणे गरजेचे आहे.

एखाद्या साध्या गोष्टीवरून आपण आपल्या नात्यातील व्यक्तींसोबत, मित्रासोबत बोलणे बंद करतो. ते इतके बंद करतो की आपल्याला कधीतरी तो आपल्या रक्तातला, आपल्या जिव्हाळ्यातला माणूस होता याचाही विसर पडतो आणि मग नात्यात मोठा दुरावा निर्माण होतो. हा दुरावा अस्वस्थ वाटणारा जरी असला तरी तो कालांतराने अंगवळणी पडतो आणि मग रक्ताची नाती दुरावली की एखादा समाजातील कुठलातरी व्यक्ती आपल्याला जवळचा होतो. तीच माणसे आपल्याला जवळची वाटायला लागतात. बर्‍याचदा एकाच कुटुंबात असणारी माणसे एकमेकांचा हेवादावे करतानाही अबोला धरतात आणि मग संवाद दुरावतो. संवाद दुरावला की एकत्र कुटुंब विभक्त होतात आणि मग नवरा, बायको त्यांची दोन मुले या पलीकडे त्यांचे जग नसते. एखाद्या मॉलमध्ये जाणे असेल, एखाद्या हॉटेलमध्ये खाणे असेल, कुठलातरी चित्रपट पाहणे असेल किंवा एखाद्या पर्यटन स्थळ जाणे असेल तर ती ही चार लोकच किंवा त्याहीपेक्षा कमी सदस्य असणारे कुटुंब पाहताना किंवा फिरताना दिसतात. एकत्र कुटुंब म्हणजे त्या कुटुंबातील अन्य सदस्य मात्र त्यांच्यासोबत नसतात, कारण आम्हाला एकाकी राहण्याची सवय लागलेली आहे. यामुळे घरात संस्कार कमी झाले आहेत. आपल्या घरातील मुलांना अन्य सदस्यांची भीती उरली नाही. नात्यातला आदर उरला नाही. स्नेह, आपुलकी, जिव्हाळा आटत चालला आहे. त्यामुळे ही मुले स्वैर वागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाईलमध्ये आपण तासन्तास गुंतून बसतो परंतु आपल्या बाजूला असलेल्या आपल्या आईची-वडिलांशी, पत्नीशी, भावाशी आपल्या मुलांशी बोलण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. रेल्वेतून प्रवास करताना अथवा बसमधून प्रवास करताना जर आपण प्रवाशाकडे पाहिलात तर ते आपल्या बाजूला बसलेल्या प्रवाशांच्या सुख-दुःखाशी त्यांना आता देणे घेणे नाही तर ते आपल्या मोबाईलमध्ये काही तरी बघण्यात आणि शोधण्यात व्यस्त दिसत असतात; परंतु आता गावाकडच्या एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी हद्दपार होतानाही दिसून येत आहात. खरे तर ही परिस्थिती योग्य वेळीच सावरली नाही तर सामाजिक परिणाम अत्यंत गंभीर असतील हेही तितकेच खरे. संवाद केवळ नात्यापुरताच नाही तर संवाद समाजाशी असावा. समाज-राष्ट्राशी असावा. संवाद समाज हितासाठी असावा, कारण संवादातून मने जुळतात. माणसे जुळतात. समाज जुळतो आणि नवराष्ट्र निर्माण होते. म्हणून आधुनिक सुख सोयी किती आल्या तरी बोलणे बंद करू नका, कारण एकमेकांशी बोलणे सुरू असेल तर जग सुरू राहील. जग सुरू असेल तरच तुम्ही आम्ही जगू. अन्यथा मोबाईल एका कोपर्‍यात जसा आपण वापरून फेकून देतो तशी आपली नाती आपल्याला फेकून देतील. तेव्हा आपण एका कोपर्‍यात एक वस्तू म्हणून कायम राहू का? ही परिस्थिती कोणावर येऊ नये. यासाठी चला आजपासून आपापल्या नात्यातील प्रत्येकाशी संवाद साधूया. तुटलेली नाती आणि मन पुन्हा जोडूया. एकमेकांच्या सुखदुःखात पुन्हा सहभागी होऊया आणि पुन्हा एकदा आनंदी समज निर्माण करूया, कारण नाते कोणतेही असो त्यात संवाद असावाच लागतो. संवाद नसेल तर रक्तवाहिन्या नसलेल्या शरीरागत आपले कुटुंब आणि आपले जीवन आहे असे समजावे लागेल.

राम तरटे
८६००८५२१८३

You Might Also Like

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

Ganesh Chaturthi: गणपतीला ‘विघ्नराज’ का म्हणतात? ‘ही’ पौराणिक कथा जाणून घ्या!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MLA Santosh Bangar
मराठवाडाराजकारणहिंगोली

MLA Santosh Bangar: कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत संतोष बांगर खांद्याला खांदा लावून लढणार: आमदार संतोष बांगर

Deshonnati Digital Deshonnati Digital October 12, 2025
Dr. Punjabrao Deshmukh: डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय प्रथम पारितोषिकाचा मानकरी
India vs England :
Sanjay Jadhav: खा. जाधव डॉक्टरांचा प्रश्न लोकसभेत उचलणार; विद्यार्थ्यांना दिले आश्वासन
Tahawwur Rana: संजय राऊत यांनी तहव्वुर राणाबद्दल केली मोठी भविष्यवाणी…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Supreme Court CJ B. R. Gawai
Breaking Newsदेशप्रहारमहाराष्ट्रसंपादकीय

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

October 12, 2025
Jolly LLB 3 And Farmer
मनोरंजनप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

September 28, 2025
Farmer Loan Waiver
Breaking Newsप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

September 22, 2025
Prakash Pohare
विदर्भअकोलामहाराष्ट्रलेखशेतीसंपादकीय

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

September 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?